सामाजिक

भारतीय स्टेट बँक घाटंजी शाखेत कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभारामुळे निराधार, वयोवृध्दांणा नाहक त्रास.

Spread the love

थम जुळेणा पैसा मिळेना’ आधार अपडेट व ई केव्हायसी ची नेहमीचीच भानगडं वयोवृध्द, निराधार,अशिक्षीत खातेदार त्रस्त.

घाटंजी तालुका प्रतिनिधी- सचिन कर्णेवार

भारतीय स्टेट बँक शाखा घाटंजी येथील शाखेत कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराला वयोवृद्ध ,अपंग निराधार ग्राहक अक्षरश: वैतागले आहेत. ग्राहकांनी आपल़्या खत्यातील रक्कम वव्यवहार संमंधी काही प्रश्न विचारले तर,चारलेल्या प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित न देता अरेरावी करीत ग्राहकांना अपमानास्पद वागणूक देत असल्याचा प्रकार येथील शाखेत होत आहे. ८० ते ८५ वर्षाचे वयोवृद्ध,अपंग निराधार लाभार्थाचे थम लागत नसल्याने. ‘थम जूळेना पैसा मिळेना’ ही परिस्थिती असुन वयोवृद्धासह निराधारावर बँक कर्मचाऱ्यांनमुळे उपासमारीची वेळ आली आहे.बँकेत निराधाराचे अनुदान आले का विचारणा केली तर, तहसील मधे चौकशी करा नंतर या ही उत्तर मिळतात. तहसील कार्यालयात चौकशी केली तर, आम्ही तर पाठवून दहा दिवस झाले असे सागतात परत बँक मधे खातेदार गेल्यास पैसे जमा झाले साहेब म्हटल्यावर खात्यावर अनुदान जमा केल्या नंतर पैसे काढाण्यासाठी तर बाहेरून थम ने काढा असा आदेश कर्मचारी देतात. मिनी बँकेत थम लागत नाही म्हणून ते सुध्दा मेन शाखेत पाठवितात. तेथे चौकशी केली तर तुम्ही आधार आपडेट करा व ई केवाशी करा नाही तर रक्कम मिळणार नाही ही उत्तरे आता नित्याचीच झाली आहे. केव्हायसी,अपडेट सागून हात झटकून अधिकारी मोकळे होतांना दिसत आहे. पोस्टामधे आधार सेंटर येथे गेले असता ते अंगठ्याच्या रेषा दिसत नाही व डोळे सुध्दा स्कँन होत नाही त्यामुळे आधार आपडेट होणार नाही ही परिस्थिती आहे. मगं निराधाराने काय भिक मागून जिवन जगावे? की मरावे ? अशी समस्या निराधारापुठे येवून ठेपली आहे. निराधाराचे व खातेदार यांचे म्हणणे आहे कि,आम्ही पासबुक तुमच्या बँक शाखेत काढले तेव्हा या बारा भानडी नव्हत्या काय?. तुमच्या समोर निराधार, वयोवृद्ध अपंग,लाभार्थी जिवंत रांगेत उभा असतांना मरता खेपी हि भानगड कशाला?. हा बँकेचा नाहक त्रास थांबवून आम्हाला आमच्या माय-बाप सरकार ने जे मासिक अनुदान दिले ते त्वरीत द्यावे किंवा काही पर्यायी व्यवस्था करावी अशी आर्थ हाक निराधार, वयोवृध्द यांचे कडून येत आहे. तरी पालकमंत्री व जिल्हाधिकारी साहेब यांणी थोडं निराधाराकडे लक्ष द्येऊन ही भानगड त्वरीत सोडवावी नाही तर आम्हाला उपाशी मेल्याशिवाय पर्याय नाही अशी मागणी निराधार वयोवृद्ध, अपंग व्यक्ती कडून केली जात आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close