वाचा तिने सॉरी जानू दोन दिवस लेट झालं असं का म्हटलं
जयपूर / नवप्रहार मीडिया नेटवर्क
‘ प्रेम ‘ या शब्दाचा जिव्हाळा वेगळाच आहे. ज्याला प्रेम होतं त्याला किंवा तिला त्याच्या किंवा तिच्या शिवाय करमत नाही. त्यांना जगाची कुठलीही वस्तू प्रेमपुढे तुच्छ वाटते.प्रेमात जर विरह आला तर त्याची किंवा तिची स्थिती कशी होते. हे शब्दात सांगणे फार कठीण . जो प्रेमात पडला तोच विरहाचे दुःख समजू शकतो. एका प्रियकराने विरहाच्या दुःखात स्वतःला संपवून घेतले आहे. तर ही बाब 2 दिवसांपूर्वी लग्न झालेल्या नववधू प्रेयसीला समजल्यावर तिने सुद्धा मार्मिक पोस्ट टाकत आत्महत्या केली आहे. दोघांच्याही मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून त्यांच्या कुटुंबियांचा दु:खाला पारावार उरलेला नाही.
राजस्थानच्या बाडमेरमध्ये ही दु:खद घटना घडली असून आत्महत्या करण्यापूर्वी प्रेयसीने सोशल मीडियावर तिचा व प्रियकराचा फोटो टाकत एक स्टेटसही शेअर केले होते.
असा मॅसेज टाकून संपवले जीवन –
‘आपण एकत्र जगण्या-मरण्याची शपथ घेतली होती ना, मग एकट्याने असे पाऊल का उचलले? तू मला या क्रूर जगात एकटे का सोडले ? असा सवाल प्रेयसीने विचारला आहे. ‘ पण हरकत नाही, आता मी तुझ्याकडे येत आहे. तू नेहमीच माझी जान असशील. दोन दिवस झाला, त्यासाठी माफ कर.’ अशा आशयाचा मेसेज तिन लिहीला आहे.
4 जुलै रोजी झाले होते लग्न
शोभाला जेतमाल येथे राहणाऱ्या या युवतीचे (वय २२) आणि त्याच गावातील एका तरूणाचे (वय २८) एकमेकांवर प्रेम होते. दोघंही स्पर्धा परीक्षेची तयारीही करत होते. मात्र अचानक ४ जुलै रोजी तिचे लग्न दुसऱ्या व्यक्तीशी झाले. यामुळे हताश झालेल्या प्रियकराने त्याच दिवशी विहीरीत उडी मारून जीव दिला. ५ जुलै रोजी जेव्हा ती नवविवाबीत तरूणी माहेर आली, तेव्हा तिला तिच्या प्रियकराच्या आत्महत्येबद्दल कळलं.
विहीरीत सापडला नवविवाहीतेचा मृतदेह
शुक्रवारी, 7 जुलै रोजी सकाळी विवाहीत तरूणी तिच्या घरातून भांडी घेऊन गोठ्यात, दूध काढण्यासाठी गेली होती. मात्र बराच वेळ होऊनही ती न परतल्याने नातेवाईकांनी तिचा शोध सुरू केला. तिच्या पायाच्या ठशांवरून शोधत-शोधत तिचे नातेवाईक विहिरीजवळ पोहोचले. तेथे विहिरीत त्या नवविवाहितेचा मृतदेह आढळला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर तो मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.