विदेश

पाकिस्तान मधील भयाण वास्तव ; संध्याकाळी ५ नंतर महिला तरुणी सुरक्षित नाही 

Spread the love

भारतात वास्तव्यास असलेल्या महिलेने सांगितले अनुभव

जळगाव / विशेष प्रतिनिधी 

             पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्याचा आदेश बजावला आहे. पण मागील दोन वर्षांपासून जळगाव येथे वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांनी तेथील भयाण वास्तव मांडत त्यांना येथेच राहू द्यावे अशी विनवणी कोई आहे.

जळगावमध्ये  दीर्घकालीन व्हिसावर  राहणाऱ्या अनेक पाकिस्तानी कुटुंबांनी सांगितले की, पाकिस्तानात परिस्थिती अत्यंत बिकट आहे. गॅस, पाणी, वीज या मूलभूत सुविधांची वानवा आहेच, पण त्याहून अधिक जीवघेणी भीती आहे. एका नागरिकाने सांगितले, ‘आम्ही तिकडे ५० वर्षे राहिलो, पण संध्याकाळी ५ नंतर दुकान बंद करून भीतीने घरात बसावे लागायचे.’

अनेक महिलांनी सांगितले की, पाकिस्तानात महिला आणि मुली अजिबात सुरक्षित नाहीत. ‘बाहेर पडणेही मुश्कील होते. मुली-बाळींना उचलून नेले जाते. अशा दहशतीखाली आम्ही जगत होतो,’ असे त्यांनी म्हटले. याच अत्याचाराला कंटाळून त्यांनी भारत  गाठल्याचे स्पष्ट केले.

‘आम्ही गेल्या २ ते ४ वर्षांपासून जळगावात  आहोत आणि इथे आम्हाला सुरक्षित वाटते, आनंद मिळतो,’ अशी भावना या नागरिकांनी व्यक्त केली. त्यांनी भारत सरकारकडे  कायमस्वरूपी नागरिकत्व देण्याची मागणी केली असून, त्यासाठी कायदेशीर प्रक्रियाही सुरू आहे. आम्हाला आता पुन्हा त्या नरकात (पाकिस्तान) जायचे नाही, असे ते म्हणाले.

पाकिस्तानात अडकलेल्या आपल्या नातेवाईकांनाही भारतात (India) आणण्याची परवानगी मिळावी, अशी त्यांची विनंती आहे. काही दिवसांपूर्वी ‘नूरी व्हिसा’वर  पाकिस्तानात गेलेले त्यांचे कुटुंबीय पहलगाम  घटनेनंतर तिथेच अडकले असून, त्यांना परत भारतात (India) येऊ द्यावे, अशी आर्त मागणीही या बांधवांनी केली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close