महिलामध्ये ह्रदयरोगाचे प्रमाण वाढले
बदलत्या जीवनशैलीमुळे ;रोगांचे प्रमाण वाढले
महिलांनी धावपळीच्या युगात स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यावी, आरोग्य तज्ञांचा महिलांना सल्ला
आर्वी /प्रतिनिधी…
साप्रंत काळात महिलांची ,दिवसोदिवस बदलती जाणारी दैनंदिन जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या अनियमित सवयीमुळे ह्रदय विकारांचा धोका सतत झपाट्याने वाढत असून, गेल्या काही वर्षांत त्याची प्रकरणे झपाट्याने वाढली आहेत. किबहुना काही उच्चभ्रू वर्गातील महिलामध्ये धुम्रपान वाढत असल्याने त्याचा परिणाम हा आरोग्यावरही झपाटय़ाने होत आहेत. तसेच महिलांचा आहार आणि जीवनशैली पुर्वीच्या तुलनेत खूपच. बिघडली आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये ह्रदय रोग. वाढले आहेत.
ह्रदय रोग डॉक्टरांच्या मते ३०ते३५ महिलांच्या मुत्युसाठी हार्ट डिसीज कारणीभूत असतो. कोणत्याही वयोगटातील महिलामध्ये याचा प्रसार होत आहे.
*महिला मधील ह्रदय रोगाची. नेमकी कारणे*
सध्याच्या काळात महिलांची बदलेली जीवनशैली, चुकीचा-आहार-विहार, हायब्लड प्रेशर, अतिलठ्ठपणा,उच्च कोलेस्टेरॉल, व्यायामाचा अभाव यामुळे महिलामध्ये हदयरोग झपाटय़ाने वाढत आहेत. त्याच बरोबर महिलामध्ये काही प्रमाणात वाढत जाणारे धूम्रपान यासवयी देखील वाढत असून हे.देखील हदयरोगाला नेमके कारणीभूत ठरत आहेत..
*हदयरोगाचे लक्षणे काय*??
छातीत दुखणे,जडपणा जाणवणे, छातीत तीव्र वेदना होऊन खांदा, हात जबडा किंवा पोटापर्यंत पोहोचणे,श्वास घेण्यास अडचण होणे, घाम येणे, चक्कर येणे, हदयाचे ठोके अनियमित होणे, मळमळ होणे, सतत थकवा जाणवणे, अशा प्रकारची प्रामुख्याने लक्षणे दिसून येतात.
हदयरोग टाळण्यासाठी महिलांनी आपली जीवनशैली बदलवून ती आरोग्य दुष्टया निरोगी बनवावी. रोज सकस आहार घ्यावा. दररोज हलके-फुलके व्यायाम करून स्वतः ला शारीरिक दुष्टया सक्रिय ठेवावे. तसेच पुरेशी झोप आणि पुरेसे पाणी प्यावे. तदवतच मधूमेह आणि उच्च रक्तदाबापासुन स्वतः चे रक्षण करावे. त्याचबरोबर आपले वजन नियंत्रणात ठेवावे.महिलामध्ये मासिक पाळी गेल्या नंतर साधारणतः ४२ते ४५वयानंतर हाँर्ट डिसीज चे प्रमाण जास्त असते. परंतु वर्तमान स्थितीत बदलत्या जीवनशैली मुळे हदयरोगाचे.प्रमाण वाढले आहेत. परंतु रुग्णांनी घाबरून. न जाता सकारात्मक दुष्टिकोन ठेवून धावपळीच्या युगात, स्वतः च्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच हदयरोग तज्ञांचा योग्य सल्ला घ्यायला हवा.
*डॉक्टर अरुण पावडे*
ख्यातनाम हदयरोग तज्ञ
M.D आर्वी जिल्हा. वर्धा
आजच्या वर्तमान स्थितीत महिलामध्ये. हदयरोगाचा. धोका हा सतत वाढत आहेत. बदललेली जीवनशैली,चुकीचा आहार, अयोग्य दिनचर्या, पुरेशी झोप न होणे, यामुळे महिलांना हदयरोगाचा त्रास वाढत आहेत. विशेषतः अनेक महिला डॉक्टरांचा सल्ला न घेता, आपले दुखणे अंगावर काढतात. डॉक्टराकडे जाण्यास टाळतात. त्यामुळे ह्रदयाशु संबंधित त्रास जाणावताच वेळीच रुग्णालयात जाऊन उपचार करून. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली योग्य औषधोपचार घ्यावा.
*डॉक्टर रोशन जावळेकर*
*नामवंत. हदयरोग तज्ञ*
आर्वी जिल्हा. वर्धा