सीएनजी गळतीमुळे कार का लागलेल्या आगीत पाच लोकांचा होरपळून मृत्यू, चालक गंभीर

नवी दिल्ली /विशेष प्रतिनिधी
वैष्णो देवीचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला निघालेल्या कुटुंबाच्या भाड्याने घेतलेल्या वाहनाला सिएनजी गळतीमुळे लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील पाच लोकांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. तर कार चालक गंभीर रित्या भाजला आहे. त्याचेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.ही दुर्दैवी घटना दिल्ली – मुंबई एक्सप्रेस व वर अलवर जिल्ह्यात घडली आहे.
चालकावर सध्या जयपूर येथील एसएमएस रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना रात्री उशिरा साधारणपणे ११:०० वाजण्याच्या सुमारास राजस्थानमधील अलवर जवळ घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्ह्यातील चैनपुरा गावातील एक कुटुंब वैष्णोदेवीचे दर्शन घेऊन आपल्या गावी परतत होते. या प्रवासासाठी कुटुंबाने ही गाडी भाड्याने घेतली होती. राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील लक्ष्मणगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या ‘मौजपूर’ गावाजवळ पोहोचताच, अचानक सीएनजी गॅसची गळती सुरू झाली. ही गळती इतकी तीव्र होती की, गॅसने त्वरित पेट घेतला आणि काही कळायच्या आत कारमधील पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला.
कारला लागलेली आग इतकी भीषण होती की गाडीतून कोणालाही स्वतःचा बचाव करण्याची संधी मिळाली नाही. या अपघातात तीन महिला, एक पुरुष आणि एक लहान मुलीचा होरपळून कोळसा झाला. त्यांचे सांगाडेही शिल्लक राहिले नाहीत. घटनेचे स्वरूप स्पष्ट करताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, सीएनजीमुळे लागणाऱ्या आगीची उष्णता इतकी प्रचंड असते की, त्यामुळे हाडेही वितळू शकतात; परिणामी, मृतांच्या अस्तित्वाच्या केवळ पुसटशा खुणाच घटनास्थळी दिसून येत आहेत.
चालक गंभीररित्या भाजला
या घटनेत चालकही गंभीररित्या भाजला असून त्याला गाडीतून बाहेर काढून तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी त्याला जयपूर येथील एसएमएस रुग्णालयात हलवले असून, तिथे त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. लक्ष्मणगड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नेकी राम यांनी सांगितले की, ही घटना रात्री ११:०० वाजण्याच्या सुमारास घडली. या कुटुंबाने प्रवासासाठी ही गाडी टॅक्सी म्हणून भाड्याने घेतली होती. दुर्घटनेतील सर्व मृत व्यक्ती श्योपूर जिल्ह्यातील चैनपुरा येथील रहिवासी होत्या. सीएनजी आणि पेट्रोल या दोन्ही इंधनांवर चालणाऱ्या या गाडीमध्ये गॅस गळती झाल्यामुळे ही आग लागली होती.
घटनेची माहिती मिळताच, मृतांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी करण्याकरिता एक वैद्यकीय पथक घटनास्थळी पाचारण करण्यात आले. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांनाही याविषयी माहिती देण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या पाचारण करण्यात आल्या होत्या आणि त्यांनी आगीवर यशस्वीरित्या नियंत्रण मिळवले. आग पूर्णपणे विझवली जाण्यापूर्वीच चालकाचा वगळता आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या कारमधील इतर सर्व व्यक्तींचा होरपळून मृत्यू झाला.




