सतत वीज पुरवठा खंडित होत असल्याने ग्रामीण भागातील नागरिक त्रस्त
#दोन महिन्यापासून विजेचा लपांडव
# सरपंच संघटना ने दिले निवेदन
*चांदुर रेल्वे ( ता. प्र.) प्रकाश रंगारी*
चांदुर रेल्वे तालुक्यातील दहेगाव धावडे, कवठा कडू, देघी कोल्हे, धानोरा मोगल, भिलटेक पळसखेड,आणि सावंगी संगम या गावांना मालखेड येथून वीजपुरवठा होतो. परंतु मागील 2 महिन्यापासून विजेचा लपंडाव हा या भागातील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असून, स्थानिक कर्मचारी नागरिकांच्या तक्रारीकडे लक्ष देत नसल्याचे ग्रामीण भागातील लोकांच्या समस्या घेऊन सरपंच संघटनाने उपअभियंता कार्यालयात निवेदन देऊन समस्येचे निराकरण करण्याची मागणी केली आहे.
एकीकडे सूर्य आग ओळखत आहे.तर दुसरीकडे वीज वितरण कंपनीचे कर्मचारी नियमबाह्य वीज पुरवठा खंडित करून. ग्रामीण जनतेला वेठीस धरत असल्याने, ग्रामीण भागातील नागरिक त्रस्त होऊन मालखेड रेल्वे येथे वीज कार्यालयात तक्रारी घेऊन गेले असताना या ठिकाणी कार्यरत कर्मचारी यांच्या तक्रारीला केराची टोपली दाखवत असून, उन्हाळ्यातही ग्रामीण जनतेला वीज वितरण कंपनी नायक त्रास देत असल्याने दहिगाव धावडे, कवठा कडू, दिघी कोल्हे, धानोरा मोगल, सावंगी संगम, पळसखेड, भिलटेक या गावातील सरपंच यांनी एकत्र येऊन शुक्रवार दिनांक 7 जून रोजी चांदुर रेल्वे तालुक्यातील उपअभियंता कार्यालयात निवेदन देऊन वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावे. याकरिता निवेदन दिले. यावेळी सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रशांत भाऊ कोल्हे, सरपंच पवन धावडे, अमोल लाहबर, अभिजीत राजनेकर, अमोल देशमुख, विलास धावडे सह गावातील नागरिक उपस्थित होते.