क्राइम

मित्राचा  क्रूरतेने खून करताना त्यांचे  काळीज जराही नाही पाझरले

Spread the love

डोके धडावेगळे करून केस उपटले ; नाक ,कान आणि डोळे काढले

नवी दिल्ली / नवप्रहार डेस्क 

राजधानी दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबाद जिल्ह्यातील साहिबाबाद भागातील जंगलात एका तरुणाचा मृतदेह सापडला होता. यात फत धड सापडले होते तर डोके गायब होते. खूप प्रयत्नानंतर ही शिर मिळाले नाही. पण पोलिसांनी आपले प्रयत्न सोडले नाही. शेवटी या हत्याकांडाचा उलगडा झाला असून पैश्याच्या हव्यासापोटी मित्रांनीमिळून मित्राची अत्यंत क्रूर आणि निर्दयी पने हत्या केल्याचे उघड झाले आहे. 

कोण होता मृतक –  मृतक तरुणाचे नाव राजेश कुमार होते . तो राजधानी दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबाद जिल्ह्यातील साहिबाबाद येथील रहिवासी होता. राजूच्या आई-वडिलांचे निधन झाले होते. तो दिल्लीतील ताहिरपूर येथे त्याच्या मामा गणेशसोबत राहत होता. तेथे तो चाट-पकोडे विकायचा.

काय आहे घटना –  15 जून रोजी तो अचानक बेपत्ता झाला. रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही. त्याच्या मामांनी पोलिसात तक्रार केली, पण तक्रार दाखल झाली नाही. आता प्रश्न असा होता की, राजू कुठे गायब झाला आणि त्याचा खून कोणी केला? शुक्रवारी पोलिसांनी या हत्याकांडाचा उलगडा केला.

नेमके काय झाले होते –  15 जून रोजी राजू अचानक बेपत्ता झाला. रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही. त्याच्या मामांनी पोलिसात तक्रार केली, पण तक्रार दाखल झाली नाही. आता प्रश्न असा होता की, राजू कुठे गायब झाला ? त्याला कोणी बळजबरीने उचलून नेले काय ? किंवा त्याने आत्महत्या केली काय ? ही बाब गुलदस्त्यात होती.

मित्रांनीच केले होते अपहरण – पोलिसांनी पकडलेले विकास आणि धनंजय हे मृत राजूचे मित्र होते. त्यांना ई रिक्षा चालक परमात्मा याने कमी दिवसात श्रीमंत होण्याचा मार्ग सांगितला. त्याच्या प्रलोभनाला बळी पडून त्यांनी राजुचे अपहरण केले.

काय होते अपहरणा मागील कारण – परमात्म्याशी  विकास आणि धनंजय यांची भेट झाली. परमात्माने त्याला पैसे कमवण्याचा शॉर्टकट मार्ग सांगितला. त्यांना तंत्र-क्रियांद्वारे लवकर श्रीमंत होण्याचे स्वप्न दाखवले. जेव्हा दोघांनी परमात्माला विचारले की, यासाठी काय करावे लागेल…? त्याचे उत्तर खूप भीतीदायक होते!

डीसीपी म्हणाले की, आरोपी परमात्माने विकास आणि धनंजयला सांगितले की, ते काळ्या जादूद्वारे पैसे कमवू शकतात. यासाठी मानवी कवटी आवश्यक आहे. त्यासाठी अशी व्यक्ती शोधावी लागेल, ज्याच्या कवटीवर तंत्र-क्रिया करता येईल. यासाठी परमात्माने दोघांना 5 लाख रुपयांचे आमिषही दिले. धनंजयचे पैशाच्या लोभाने त्याचे मित्र राजूकडे लक्ष गेले. 15 जून रोजी त्याने त्याचे अपहरण करून परमात्माच्या घरी नेले. तिन्ही आरोपींनी मिळून राजूला पाच दिवस दारू पाजली. त्याला नशेत ठेवले होते.

खून आणि शिरच्छेद
21-22 जूनच्या मध्यरात्री राजूची हत्या करण्यात आली. त्यांनी त्याच्या गळ्यात फास लावून त्याला पंख्याला लटकवले. त्यानंतर तिघेही त्याचा मृतदेह ऑटोमध्ये घेऊन टीला मोड़ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात गेले. तेथे आरोपींनी चाकूच्या सहाय्याने राजूचे डोके शरीरापासून वेगळे केले. त्याचे डोके प्लास्टिकच्या बादलीत ठेवून त्याचे धड जंगलात फेकण्यात आले. ती बादली घेऊन ते परमात्माच्या घरी परतले.

चाकूने डोळे काढले, नाक आणि कान कापले

त्यानंतर चाकूच्या सहाय्याने त्या डोक्यावरून त्याचे डोळे काढण्यात आले. त्याचे कान व नाक कापले गेले. त्याचे केस उपटून त्याची त्वचा सोलण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या कवटीवर तंत्र साधना करण्यात आली. पैसे कमावण्याच्या आशेने परमात्मा सात दिवस राजूच्या कवटीवर जादू करत राहिला. आरोपींनी पोलिसांना सांगितले की, परमात्मा रात्री कवटीवर तंत्र-क्रिया करत असे. यश न मिळाल्याने त्याने विकास आणि धनंजय यांना दुसरी खोपडी आणण्यास सांगितली. त्यानंतर संधी साधून तो कापलेले डोके घेऊन पळून गेला.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close