विषारी दारू प्रकरणात पोलिस आयुक्तांचा दणका, ऐकून आठ कर्मचारी निलंबित

चार अधिकारी आणि चार कर्मचाऱ्यांचा समावेश
पुणे / विशेष प्रतिनिधी
राज्यात खळबळ माजवून देणाऱ्या पिंपरी चिंचवड, पुणे परिसरात विषारी दारू मुळे झालेल्या मृत्यूची दखल घेत आयुक्त यांनी चार अधिकारी आणि चार पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. याबोरकरणाची गंभीर दखल घेत दोषींवर कडक कारवाई केल्या जाईल असे सूचक विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. या धडक कारवाईमुळे पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
हडपसर पोलीस ठाण्यातील 3 अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या प्रकारानंतर त्यांनी तीन बड्या अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत.
- संजय मोगले (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर)
- हसिना शिकलगार (सहाय्यक पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस चौकी, पुणे शहर)
- हसन मुलाणी (पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शोध पथक, हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर)
या अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात आणि हद्दीत अवैध व विषारी दारूची विक्री सुरू असताना त्यावर योग्य ती कारवाई न झाल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवडमधील दापोडी पोलीस चौकीतील 6 जण निलंबित
दुसरीकडे, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनीही अशाच प्रकारची कडक भूमिका घेत दापोडी पोलीस चौकीशी संबंधित 2 अधिकारी आणि 4 कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे. यामध्ये खालील नावांचा समावेश आहे.
- विजय वाघमारे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दापोडी पोलीस ठाणे)
- राजू भास्कर (फौजदार तथा तपास पथक प्रमुख)
- जयदीप सोनवणे (पोलीस कर्मचारी)
- नवनाथ पोटे (पोलीस कर्मचारी)
- सागर जाधव (पोलीस कर्मचारी)
- विशाल काळे (पोलीस कर्मचारी)
पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाल्याने कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण घटना पोलिसांचा निष्काळजीपणा आणि वरिष्ठ पातळीवरील पर्यवेक्षणाच्या अभावामुळे घडल्याचे समोर आले आहे. विषारी दारूच्या या गंभीर प्रकरणाच्या बातम्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाल्या होत्या. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये पोलीस दलाची प्रतिमा कमालीची मलिन झाली. तसेच पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.
पोलीस दलाची जनमानसातील विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी आणि अशा बेकायदेशीर कृत्यांना पाठीशी घालणाऱ्यांना कडक संदेश देण्यासाठी दोन्ही पोलीस आयुक्तांनी ही निलंबनाची कायदेशीर कारवाई केल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. या कारवाईमुळे अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.




