गावात घुसून नरसंहार ; मगरी खात राहिल्या मृतदेह
गिनी / एनपी इंटरनॅशनल डेस्क
तीस तरुणांच्या टोळीने गावात प्रवेश करत 50 हुन अधिक नागरिकांची हत्या केल्याची बाब उत्तर पापुआ न्यू गिनी मध्ये घडली आहे. या टोळक्या कडून हत्या करण्यात आलेल्या लोकांमध्ये पुरुष , महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. या घटनेने देश हादरला असुन सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या महिती नुसार उत्तर पापुआ न्यू गिनीमधील तीन दुर्गम गावांमध्ये एका टोळीने किमान २६ लोकांची हत्या केली असल्याचे संयुक्त राष्ट्र आणि पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यांनी म्हटले आहे की ही, संख्या 50 च्या पुढे जाऊ शकते कारण आणखी बरेच लोक बेपत्ता आहेत. दक्षिण पॅसिफिक बेट राष्ट्राच्या पूर्व सेपिक प्रांताचे कार्यवाहक प्रांतीय पोलीस कमांडर जेम्स बौगेन यांनी शुक्रवारी ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पला सांगितले की, “घटना अतिशय भयानक होती…, मी घटनास्थळी पोहोचलो तेव्हा मला लहान मुलांचे, पुरुषांचे मृतदेह दिसले. महिला तेथे पडल्या होत्या. 30 तरुणांच्या गटाने ही हत्या केल्याचे निष्पण झाले.
बोगेन यांनी एबीसीला सांगितले की, गावातील सर्व घरे जळून खाक झाली असून उर्वरित गावकरी पोलीस ठाण्यात आश्रय घेत आहेत. बौगेनच्या म्हणण्यानुसार, गावकरी हल्लेखोरांची नावे सांगण्यासही घाबरतात. “रात्री काही मृतदेह जवळच्या दलदलीतून मगरींनी खाल्ले. ज्या ठिकाणी तो मारला गेला तेच आम्ही पाहिले. लोकांचा शिरच्छेद करण्यात आला.” बॉगेन म्हणाले की हल्लेखोर लपले आहेत आणि अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयुक्त वोल्कर तुर्क यांनी बुधवारी अधिकृत निवेदनात सांगितले की, हे हल्ले 16 जुलै आणि 18 जुलै रोजी झाले. “पापुआ न्यू गिनीमध्ये अचानक झालेल्या प्राणघातक हिंसाचारामुळे मी घाबरलो आहे,” हा हिंसाचार जमिनीच्या मालकी आणि वापरावरील वादाचा परिणाम असल्याचे दिसते आणि तुर्कने सांगितले की, 16 मुलांसह किमान 26 लोक मारले गेले. “स्थानिक अधिकारी बेपत्ता लोकांचा शोध घेत असल्याने ही संख्या 50 पेक्षा जास्त होऊ शकते. याशिवाय घरे जळाल्याने 200 हून अधिक ग्रामस्थ इतरत्र गेले आहेत.



