जनतेने संधी दिल्यास शेतकरी हितासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. बंडू तोडसाम
घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक रंगतदार वळणावर
घाटंजी तालुका प्रतिनिधी- सचिन कर्णेवार.
घाटंजी कृ. उ. बाजार समितीची निवडूक ही रंगतदार वळणावर असून चारही पॅनलचे उमेदवार निवडणूक प्रचारात व्यस्त असून या प्रचार मोहिमेत किसान विकास आघाडी परिवर्तन पॅनलने आघाडी घेत तालुक्यातील मतदारा पर्यंत थेट भेट घेत आबकी बार किसान विकास आघाडी परिवर्तन पॅनलचा शेतकरी हीत अजेंडा घेऊन पॅनलला विजयी करण्याची विनंती करित प्रचाराची उमेदवाराची घोडदौड सुरु आहे, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उभे असलेले उमेदवार बंडू तोडसाम हे ग्रामपंचायत गटातून उभे असून शेतकरी हितासाठीच आपन निवडणूक लढवित असल्याचे मत व्यक्त केले, कृषी उत्पन्न बाजार समितीत कुठल्याही शेतकऱ्याचे शोषण होणार नाही यासाठी आपनास मतदारानी विजयी केल्यास शेतकरी हिताला कुठेही तडा जाऊ देणार नाही असे मत दै.जनमाध्यमच्या प्रतिनिधी जवळ व्यक्त केले . काँग्रेस,भाजप,शिवसेनेच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत आबकी बार किसान विकास आघाडी परिवर्तन पैनल (BRS) यांना , भारत राष्ट्र समिती या नावाने ओळखले जाते. या पॅनलचे सर्व उमेदवार दमदारपणे आपला प्रचार करित असून यामध्ये माजी आमदार राजूभाऊ तोडसाम यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत मधून चार उमेदवार रिंगणात उतरलविले असून त्यांना विजय करण्यासाठी त्यांनी प्रचार दौरा सुरू केला आहे जाती जमाती मधून बंडू तोडसाम, सर्व साधारण मधून विनय जाधव, सैय्यद जावेद सैय्यद अमिर,आर्थिक दूर्बल घटकातून रवींद्र अहिरकरअसे चारही उमेदवार गॅस सिलेंडर हे निशाण घेऊन निवडणूक रिंगणात उतरले असून ते कॉंग्रेस नेते मोघे व लोणकर गट आणि पारवेकर ,आमदार संदीप धूर्वे व देवानंद पवार यांच्या गट आणि शिवसेनेचे पॅनल ,निवडणुकीत विजयासाठी आपापला प्रचार करीत असून भारत राष्ट्र समितीचे अबकी बार किसान विकास आघाडी परिवर्तन पॅनलचे सर्व उमेदवार विजयासाठी जीवाचे रान करित आहे.त्यामुळे घाटंजी कृ. उ. बाजार समितीची निवडणूक ही रंगतदार वळणावर असून ग्रामपंचायत गटातून भारत राष्ट्र समितीला मतदारकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सूत्राकडून बोलल्या जात आहे.प्रस्थापितांच्या विरोधात सर्व गट एकवटले असून त्यांच्या सोबत असलेल्या मोघे गटांचे तालुक्यातील महत्वाचे नेते मंडळी आणि कार्यकर्ते प्रस्थापितांच्या विरोधात प्रचार मोहीम हाती घेतली असून त्याचा फायदा सहकारी संस्था मतदार संघातून पारवेकर गटाला आणि ग्रामपंचायत मतदार संघातून भारत राष्ट्र समितीला होणार असल्याचे सूत्राकडून समजल्या जाते त्यामुळे यावेळेस प्रस्थापितांना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.