शैक्षणिक

वाडीतील विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय स्तरावरील अबँकस परीक्षेत यश

Spread the love

वाडी(प्र):
योग्य मार्गदर्शन मिळाल्यास विद्यार्थ्यांच्या गुणांचा विकास होऊन यश संपादन करता येते, याचे ताजे उदाहरण वाडीत पाहायला मिळाले. वाडी परिसरात असलेल्या एसआयपी अबॅकस वाडीचे संचालक संतोषजी मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अथक परिश्रमाने वाडीतील १६ विद्यार्थ्यांनी हैदराबाद येथे झालेल्या अबॅकसच्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत भाग घेतला आणि जिंकली, या विजयाने विद्यार्थ्यांनी त्यांचे पालक शिक्षक आणि वाडीवासीयांचे नावलौकीक केले. या स्पर्धेत संपूर्ण भारतातून ५००० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, त्यापैकी रियांश डुले (प्रथम रनर अप), मृणाली रामभाडे द्वितीय तर सम्यक टेभुर्णे, ऋषिका कोरे, धृती चव्हाण, नमन सगणे, स्वरा लांजेवार यांनी तृतीय क्रमांक पटकावला. याशिवाय श्रेयांश चव्हाण, चैतन्य बोबडे, तीलक माहेश्वरी, मनस्वी अवचट, हर्षल देशमुख, द्राक्षी मेश्राम, निमय देवासे, रौनक रघटाटे, त्रिकांश राघोरे या सर्व ९ विद्यार्थ्यांना बेंच मार्क अवॉर्ड मिळाला. एकूण १६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व सर्व विद्यार्थी यशस्वी झाले. आणि एस.आय.पी संस्थेचे नाव लौकीक केले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close