शेती विषयक

भूमिपुत्र शेतकरी संघटनेकडून शेतकऱ्यांची आक्रोश पद यात्रा

Spread the love

 

‘सरकारचे धोरण’
शेतकर्‍यांचे मरण”

वाशीम / प्रतिनिधी

सरकारच्या सातत्यपूर्ण शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ *भूमिपुत्र शेतकरी* संघटनेकडून संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांच्या नेतृत्वात दिनांक 31 डिसेंबर 2023 ला रिसोड येथिल संत अमरदास बाबा संस्थान येथुन संकाळी 11 वा शेतकऱ्यांच्या अक्रोश पदयात्रेला सुरवात होणार आहे. सोमवार दिनांक 1 जानेवारी 2024 ला नव्या वर्षांत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पदयात्रा पोचनार आहे. 31 डिसेंबर ला सांयकाळी रिठद पोचल्याबरोबर स्टँड वर जाहीर सभा होणार आसुन रिठद येथे मुक्काम राहणार आहे. 1 जाने 24 ला सकाळी 7.30 ला रिठद येथील गजानन महाराज मंदिर पासुन सुरुवात होईल.
राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे. शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणा बाबत सभा/ घोषणा आणि जागर करीत अक्रोश पदयात्रा निघनार आसुन जिल्हाअधिकारी कार्यालय वाशिम येथे निवेदन देऊन जमा झालेल्या सोयाबीनची होळी करून जाहीर सभे नंतर अक्रोश पदयात्रेचा समारोप होईल.
शेतकरी पदयात्रेतील
*अक्रोश*

1) *सोयाबीनचे भाव सरकार ने पाडले* . सोयाबीन आणि सोयापेंड आयात केली जात आहे. आमची निर्यात बंद केली. परीणाम सोयाबीन चार ते साडेचार हजार रुपये क्विंटल ने विकले जात आहे. लावलेला खर्च सुध्दा वसुल होत नाही. म्हणून प्रत्येक शेतकरी एक-एक मुठ सोयाबीन जमा करून मातीमोल विकल्या जाणाऱ्या *सोयाबीनची होळी करणार.*

2) *कापसाचे भाव सरकार ने पाडले* . कापुस आयात केला जात आहे.
3) *तुरीचे भाव सरकार ने पाडले* . बाहेर देशातील तुर आयात करीत आहेत. एक महीन्या आधी चौदा हजार रूपये क्विंटल विकली जाणारी तुर शेतकऱ्यांच्या घरात तुरीचा माल यायला सुरुवात झाली आणि तुरीचे भाव पाच हजार रूपयावर आले.
4) कांद्याचे भाव पाडले निर्यात बंद केली.
5) गव्हाचे भाव पाडले. स्टाॅकलीमीट लावले. निर्यात बंद केली.
6) पीक विमा/ अतिवृष्टीग्रस्त/ तथा दुष्काळसदृश सर्व शेतकऱ्यांना पीक नुकसानीची मदत नाही.
7)महावितरणचा *शेतकर्यांची पीळवणुक* करणारा कारभार या सह इतर
*शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध* करण्यासाठी दि. *31 डिसेंबर 23* *रविवार* शेतकरी आक्रोश पदयात्रेतील
*मागण्यां*
1) सोयाबीनला *आठ हजार* रू. भाव द्या.
2) *कापसाला* दहा हजार भाव द्या
3) *तुर आयात* बंद करून तुरीचा हमी भाव दहा हजार करण्यात यावा
4) *कांदा* व *गव्हाची* निर्यात पुन्हा सुरू करण्यात यावी व भाव पाडण्यासाठी सरकारने प्रयत्न करू नयेत.
5) *पीक विमा* अग्रीमसह नियमित पीक विम्याचा मोबदला द्यावा.
6) कृषी पंपाला *मोफत* व *मुबलक* विज पुरवठा द्यावा शेतकऱ्यांवर दाखल विज चोरीचे गुन्हे सरकार ने तात्काळ मागे घ्यावे
7)राज्यातील सर्व दुष्काळसदृश घोषित भागात सरसकट मदत द्यावी.
वरील मागण्यांसाठी,” *भूमिपुत्र शेतकरी* संघटनेकडून” शेतकऱ्यांची *आक्रोश* पद यात्रा रिसोड ते वाशिम काढत आहोत. मागण्यां मान्य न झाल्यास तीव्र स्वरूपाचा *लढा* पुढेही सुरूच राहील. आसे शेतकऱ्यांच्या अक्रोश पदयात्रेचे आयोजक तथा भूमिपुत्र चे जिल्हाअध्यक्ष रामेश्वर आवचार यांनी कळविले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close