सामाजिक

माझी नगराध्यक्षांनी केला अनेक व्यापाऱ्यांचा विश्वासघात

अनेक व्यवसायकावर येणार उपासमारीची पाळी.

Spread the love

नेर प्रतिनिधी /  नवनाथ दरोई

नेर शहराच्या मधोमध गणपती व दुर्गा उत्सवासाठी एक मोठे आजाद मैदान होते. या मैदानात अनेक व्यापाऱ्यांची भाजीची,केळाची,चहा कॅन्टीग,मसाल्याची, ज्वारीची असे अनेक लहान,लहान व्यापाऱ्यांची दुकाने असायची. या दुकानावरील व्यवसायावर त्यांच्या, त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हायचा. त्यावेळी नेर शहरात ग्रामपंचायत असल्यामुळे ठेकेदार त्या व्यावसायिका कडून त्या जागेवरील कर म्हणून 15 पैसे वसुली घेतली जात असे. या मैदानात गणपती व दुर्गा उत्सवासाठी येथील सर्वच व्यापारी या आजाद मैदानाची जागा आठ दिवसा आधी खाली करून देत असत.या जागेवर जनतेच्या मनोरंजनासाठी रावण दहन,कलापथक, राधाबाई बूधगाकर,रामलीला असे अन्य कार्यक्रम होत असे.हजारो नागरिक या कार्यक्रमाचा आनंद घेत असे.नंतर ग्रामपंचायतचे रूपांतर नगर परिषद मध्ये झाले. नगर परिषद झाल्यामुळे बाॅडी समोर विकासाचा प्रश्न निर्माण झाला.नेर शहराचा विकास करायचा असेल तर त्यासाठी व्यापार संकुले निर्माण करणे गरजेचे असते. व्यापार संकुल शहराच्या मध्यभागी असायला पाहिजे असे माजी नगराध्यक्षाचे मत असल्याने या आजाद मैदानावर नेर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्षाची वक्रदृष्टी पडली. परंतु या आजाद मैदानात अनेक व्यापारी व्यवसाय करत असल्यामुळे एवढ्या व्यापाऱ्यां कडून आझाद मैदान खाली करुन घेने तेवढे सोपे नोव्हते,त्यामुळे माझी नगराध्यक्षांनी अनेक व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांना आपलेसे करून त्यांच्याकडून ही जागा सहा महिन्यासाठी खाली करून मागितली. तुम्ही मला ही जागा सहा महिण्यासाठी खाली करून दयाल तर मी तुम्हाला या जागेवरच सिमेंटचे ओटे बांधून देऊ असा आश्वासन दिले.व्यापारी शंकरा सारखे भोळे असल्यामुळे व्यापाऱ्यांनी विकासाच्या कामात मुळीच अडथळा न करता सर्वच व्यापाऱ्यांनी स्वतःहून आपापली टीमटाळे उचलून जागा खाली करून दिली. त्यावेळी नेर दारव्हा दिग्रस मतदार संघाचे माजी वनमंत्री संजय राठोड यांनी विकास कामासाठी व सौंदर्य करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला.दिलेल्या निधीतुन नेर शहराचे सौंदर्यकरण व विकास झाल्यामुळे माजी वनमंत्री संजय राठोड यांना विकासाचे महामेरु किवा विश्र्वकर्मा म्हणून त्यांचे नाव कार्यक्रमातून घेतले जाते. महाभारतात दुर्योधनाने पांडवांना एकही राज्य न दिल्यामुळे श्रीकृष्णाने विश्वकर्माला बोलावून खांडव वनाचे इंद्रप्रस्थात रूपांतर केले. तसेच माजी वनमत्री संजय राठोड यांनी नेर नगरीत तहसील कार्यालय,पंचायत समिती, ईदिरा मार्कट,नगर परिषद, भाजी संकूल,सभागृह अशा भव्यदिव्य वास्तुची निर्मिती केले.परंतू यामध्ये अनेक व्यापाऱ्यांचा संसार उध्वस्त झाला.मार्केट बनविल्या नंतर आपल्याला त्या जागेवर स्थान मिळेल अशी अनेक व्यावसायिकांना आशा होती.परंतू भाजीचे ओटे हर्रासाला निघाल्याने अनेक गरिब व्यावसायिकांची आशाची निराशा झालेली दिसुन येते. एवढे होउनही अनेक व्यवसायकांनी पदयात्रा काढून माजी नगराध्यंक्षाना त्यांच्या ठियावर भेटायला गेले.परंतु तेथे न भेटल्यामुळे त्यांच्या निवासस्थानी गेले.परंतु वर्तमान काळात पदावर असलेल्या नगराध्यक्षानी साधी विचारपूस तर सोडाच पन बाहेर येऊनही बघीतले नाही. महाभारतात दुर्योधनाने पांडवांना पाच गावे दिले नाही तर कौरवांचा पराभव झाला.येथे तर अनेकांच्या मनावर घाव घातला त्यामुळे येणारा काळ आणि वेळ यांचे उत्तर देईलच.अजूनही काही वेळ गेली नाही. जूण्या व्यावसायिकांना त्यांची जागा दयावी असे व्यवसायकांचे म्हणने आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

Sumit Baniya

Related Articles

Back to top button
Close
Close