ब्रेकिंग न्यूज

वर्धा लोकसभा मतदार संघात इंडिया अलायन्स मध्ये माणापमानाचे नाट्य 

Spread the love
शरद पवार गटाकडून डावलण्यात येत असल्याचा उबाठा गटाचा आरोप 
शिवसेनेने (उबाठा) गटाने बोलावली पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक 
काँग्रेस चा एक माजी आमदार राजकारण करत असल्याची चर्चा 
वर्धा / नवप्रहार डेस्क 
           वर्धा लोकसभा मतदार संघात शिवसेना (उबाठा) गटाला डावलण्यात येत असल्याचा आरोप मतदार संघातील शिवसेना गटाच्या पदाधिकाऱ्यां कडून करण्यात येत आहे.हा सगळा प्रकार काँग्रेस च्या एका माजी आमदारकडून हेतुपुरस्सर करण्यात येत असल्याचा आरोप होत आहे.
              वर्धा लोकसभा मतदार संघ इंडिया अलायन्स चा भाग असलेल्या शरद पवार गटाच्या खात्यात आली आहे. शरद पवार यांनी  हाडाचा काँग्रेस कार्यकर्ता आणि माजी आमदार अमर काळे यांना उमेदवारी दिली आहे. इंडिया अलायन्स चा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट देखील एक भाग आहे. अलायन्स चा भाग असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला मित्र पक्षांना घेऊन चालणे आणि त्यांना प्रचारात सामावून घेऊन त्याच्यावर योग्य ती जबाबदारी देणे आवश्यक होते. पण राष्ट्रवादी कडून त्यांना यिग्या तो सन्मान देण्यात येत नसल्याचे शिवसेना (उबाठा) गटाच्या पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
सेना (उबाठा ) गटाची तातडीची बैठक –  राष्ट्रवादी ( शरद पवार गट) कडून मिळणाऱ्या वागणुकीमुळे सेना उबाठा गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज झाले आहेत. त्यामुळे त्यांनी पुलगाव येथे वर्धा लोकसभा मतदार संघातील सेना (उबाठा गट) पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची तातडीची मिटिंग बोलावली आहे.
काँग्रेस च्या एका माजी आमदारांची खेळी असल्याची चर्चा – या मतदार संघात उबाठा गटाची ताकद वाढू नये म्हणून उबाठा सेना गटाला प्रचाराच्या मुख्य प्रवाहातून डावलण्यात येत असल्याची चर्चा मतदार संघात आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close