सामाजिक

लेखणीतून सामान्यांना न्याय देण्याची पत्रकारांची भूमिका

Spread the love

पत्रकारांच्या लोकाभिमूख कार्यावर मंत्री अशोक उईकेंचे भाष्य
श्रमीक पत्रकार संघाचा पत्रकार दिन


यवतमाळ : स्वातंत्र्यपुर्व व स्वातंत्र्यानंतरच्या काळातही पत्रकारांची भूमिका मोलाची राहिली आहे. लेखणीच्या माध्यमातून पत्रकारांनी सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचे सेवाव्रत कायम ठेवले. एक मोठा वारसा जिल्ह्याच्या पत्रकारीतेला असून पत्रकाराचा सन्मान आयुष्यभर बाळगू असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी केले. ते महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघ संलग्नीत यवतमाळ जिल्हा श्रमीक पत्रकार संघाने आयोजित केलेल्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती व मराठी पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
स्थानिक जेष्ठ नागरीक भवनात आज सोमवारी 6 जानेवारीला मराठी पत्रकार दिनानिमित्त श्रमीक पत्रकार संघाने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी मंत्री अशोक उईके कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, जेष्ठ पत्रकार अनिरुध्द पांडे, श्रमीक पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत राउत, सचिव अमोल ढोणे विचारपीठावर उपस्थित होते. प्रारंभी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांनी केले. मराठी भाषेतील पहिले दर्पन हे वृत्तपत्र 6 जानेवारी 1832 रोजी सुरु केले. पहिला अंक 6 जानेवारीला निघाल्याने राज्यात शासनाने हा दिवस पत्रकार दिन म्हणून घोषित केला. यावेळी बोलतांना मंत्री उईके यांनी जिल्ह्यातील पत्रकारांसोबत असलेल्या आपल्या ऋणानुबंधावरही भाष्य केले. लेखणीच्या माध्यमातून संविधानातील अधिकार व हक्क सर्व सामान्य माणसांपर्यंत पोहोचविण्याची भूमिका पत्रकारांची राहिली आहे. मला सर्वच पत्रकारांबद्दल आदर असल्याचेही उईके म्हणाले. आगामी काळात एक चांगले आरोग्य शिबीर घेण्याच्या दृष्टीने आपले सहकार्य राहिल, असे त्यांनी स्पष्ट केले. सोबतच पत्रकार भवनाच्या संदर्भातही पुढाकार घेउन मदत करु, अशी ग्वाही त्यांनी दिली. राज्यात नसेल असे पत्रकार भवन यवतमाळात निर्माण झाले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यासाठी आपण पुढाकार घेउ, अशी हमी त्यांनी दिली. कार्यक्रमाचे अतिथी तथा जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड यांनीही आपल्या भाषणातून जिल्ह्यातील पत्रकारांची भूमिका नेहमी सहकार्याची राहत असल्याचे भाष्य केले. तर जेष्ठ पत्रकार अनिरुध्द पांडे यांनी पत्रकारीतेच्या बदलत्या संदर्भावर भाष्य केले. एखादी बातमी सुटल्याची खंत वाटणे हे पत्रकारीता जिवंत असल्याचे लक्षण होय, असे ते म्हणाले. कुणासोबत कसेही संबंध असले तरी पत्रकाराने सत्य मांडले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. प्रास्ताविकातून श्रमीक पत्रकारसंघाची भूमिका अध्यक्ष श्रीकांत राउत यांनी मांडली. कार्यक्रमाचे संचालन केशव सवळकर यांनी केले. तर आभार सुरेंद्र राउत यांनी मानले. या कार्यक्रमाला पत्रकार दिनेश गंधे, गणेश बयास, नितीन पखाले, राजकुमार भितकर, नितीन भागवते, अविनाश साबापूरे, विवेक गावंडे, विवेक कवठेकर, नागेश गोरख, गणेश राउत, मेहमुद नाथानी, रुघुवीरसिंह चव्हाण, विरेंद्र चौबे, चेतन देशमुख, रुपेश उत्तरवार, प्रविण देशमुख, अमोल शिंदे, किशोर जुनुनकर, प्रा. विवेक विश्‍वरुपे, दिपक शास्त्री, संजय सावरकर, श्‍याम वाढई, तुषार देशमुख, मनिष जामदळ, अतुल राउत, सुधीर मानकर, लक्ष्मणलाल खत्री, विवेक वानखेडे, जयंत राठोड, संजय राठोड, नितीन भुसरेड्डी, राहूल वासनिक, विजय बुंदेला, अनिकेत कावळे, मकसूद अली, सय्यद मतीन सय्यद मुनाफ, रवीश वाघ, गौतम गायकवाड, नितीन राउत, श्‍याम आरगुलवार आदी उपस्थित होते

 

पत्रकारांशी 24 वर्षांपासून ऋणानुबंध
आमदार व मंत्री नव्हतो तेव्हाही माझे पत्रकारांशी स्नेहपुर्ण संबंध होते. स्वातंत्र्यपुर्व व स्वातंत्र्यानंतरची पत्रकारांची भूमिका समाजाला न्याय देणारी होती. समाजाला योग्य दिशा देण्याचे काम पत्रकारांनी केले आहे. संविधानाची मुल्य राखून सामान्य माणसाचे हक्क व अधिकार अबाधित राखण्याचे काम पत्रकारांनी केले आहे. त्यामुळे पत्रकारांवर आपल्याला गर्व असल्याचेही राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी आपल्या भाषणात नमूद केले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close