स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त, राष्ट्रीय विचार मंचाद्वारे लंकेनाथ धाम मंदिरावर ध्वजारोहन,पाहूण्यांचा सत्कार.
नेर:-नवनाथ दरोई
दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार यांच्या सहयोगाने, महाराष्ट्रात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने, मेरी माटी मेरा देश व हर घर तिरंगा हे अभियान देशभर राबविल्या जात आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रीय विचार मंचाद्वारे लंकेनाथ धाम येथिल सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे ज्येष्ठ नेते विलास राखडे तर प्रमुख पाहुणे म्हणून उदय कानतोडे, सुभाष वाघमारे, अमित मोहोड, विना खोडवे, साधू पाटील, मंच्यावर विराजमान होते. अध्यक्षाच्या शुभहस्ते व पाहुण्याच्या उपस्थित राष्ट्रमाता व स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी माजी सुभेदार यांच्या शुभहस्ते लंकेनाथ धाम मंदिरावर ध्वज फडकवण्यात आला. नंतर मातीला नमन करून वृक्ष लागवड करण्यात आली. कार्यक्रमात सुभाष नाल्हे यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी वीराना वंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप राखडे, सूत्रसंचालन मनोज दुधे यांनी केले.पाहुण्याच्या आभाराने कार्यक्रमाचे सांगता झाली.