सामाजिक

राहुरी येथील विश्वमनी ग्रामीण मल्टिपर्पज निधी ली. या कंपनीने फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करा;

Spread the love
 संचेती कुटुंबीयाची पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे मागणी 
 अहमदनगर प्रतिनिधी: राहुरी येथील विश्वमनी ग्रामीण मल्टिपर्पज निधी ली. या कंपनीने फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करा संचेती कुटुंबीयाची पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे मागणी केली यावेळी पियुष संचेती व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते
        निवेदनात म्हटले आहे की विश्वमनी ग्रामीण मल्टिपर्पज निधी ली. या कंपनीच्या राहुरी शाखेत एक एक लाख रु च्या मुदत ठेवी केल्या होती, त्याची मुदत २०/९/२०२४ रोजी संपलेली आहे. सदर मुदत ठेव पावत्याची रक्कम संस्थेकडे वारंवार मागणी करून ही मिळत नाही. माझी घरगुती अडचण असल्यामुळे मला माझ्या पैशांची अडचण आहे. सदर संस्थेचे चेअरमन, मॅनेजर, व संचालक माझी ठेवीची रक्कम देण्यास टाळाटाळ करत आहे. ९ टक्के व्याजदराने या सर्व ठेवी ठेवलेल्या आहेत. या संपूर्ण मुदत ठेवींची रक्कम नऊ लाख रुपये आहे. माझे वडील आजारी असल्याने वैद्यकीय कारणासाठी पैश्यांची गरज आहे. मी आज कंपनीच्या कार्यालयात गेलो असता. मला कंपनीचे चेअरमन गणेश गोपाळे यांनी रक्कम मिळनार नाही तसेच अनेक उडवा उडवीची उत्तरे दिले. मला पैश्याची अत्यंत गरज आहे. मात्र मला माझे पैसे मिळत नाहीत. कंपनीचे चेअरमन गणेश रमेश गोपाळे, संचालक शंतनू रमेश गोपाळे; संचालक आदिनाथ विकास दाणे यांच्यावर राहुरी पोलीस ठाणे येथे  त्वरित गुन्हे दाखल करावेत.या संस्थेत इतर ठेवीदारांच्या देखील ठेवी मिळत नाहीत. अशी माहिती आहे. आपण पोलीस या प्रकरणात त्वरित लक्ष घालावे व मला न्याय द्यावा असे निवेदनात म्हटले आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close