तुम्हालाही पैशाची चणचण भासते काय ? तर याकडे करू नका दुर्लक्ष

याला ‘मनी ब्लॉक’ म्हटले जाते. मनी ब्लॉक म्हणजे आपल्या काही सवयी आणि कृती ज्यामुळे आर्थिक समृद्धीचा प्रवाह थांबतो. येथे आम्ही अशा 6 सवयींचा उल्लेख करतो ज्या पैशाच्या अडथळ्याला कारणीभूत ठरू शकतात.
पाण्याची गळती : काही संस्कृतींमध्ये असे मानले जाते की, पाण्याची गळती किंवा सतत वाहणाऱ्या नळांमुळे घरातील पैसा हळूहळू संपतो. जसे पाणी गळून जातं, तसंच घरातील संपत्तीही झपाट्याने कमी होते. त्यामुळे नळाची गळती त्वरित दुरुस्त करणे आवश्यक आहे. हे केवळ पाण्याची बचत करण्यासाठीच नव्हे तर आर्थिक नुकसान टाळण्यासाठीही महत्त्वाचे आहे.
अस्ताव्यस्त घर : अनेक संस्कृतींमध्ये, अस्ताव्यस्त घराला नकारात्मक उर्जेसाठी कारणीभूत मानले जाते. जिथे स्वच्छता नसते, तिथे सकारात्मक ऊर्जा फिरत नाही. वास्तु शास्त्र आणि फेंग शुईनुसार, स्वच्छता समृद्धीचा मार्ग आहे. अस्ताव्यस्त जागा म्हणजे अस्थिर मनाचा संकेत, जो खराब आर्थिक निर्णय घेण्यास कारणीभूत ठरतो.
अनावश्यक खरेदी : हिंदू धर्मात ‘श्राद्ध’ किंवा ‘पितृ पक्ष’ खूप महत्त्वाचा आहे. या काळात पितरांचा सन्मान करण्याचा प्रघात आहे. हा वेळ अध्यात्मिक कार्यांसाठी समर्पित असल्यामुळे भौतिक खरेदी टाळणे योग्य मानले जाते. या काळात अनावश्यक खरेदी केल्याने सकारात्मक प्रवाहात अडथळा येतो, असा विश्वास आहे.
दक्षिण-पश्चिम कोपऱ्याकडे दुर्लक्ष : वास्तुनुसार, घराचा दक्षिण-पश्चिम कोपरा हा संपत्ती आणि स्थिरतेसाठी महत्त्वाचा आहे. या कोपऱ्याकडे दुर्लक्ष केल्यास किंवा ते अस्ताव्यस्त ठेवल्यास आर्थिक अडथळे निर्माण होतात. हा कोपरा स्वच्छ ठेवा, देवतांची प्रतिमा ठेवा, किंवा पैशाचे झाड ठेवल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते.
तुटलेल्या कुबेर मूर्तीचा उपयोग : भगवान कुबेर हे संपत्तीचे देव मानले जातात. लोक दिवाळीत कुबेराची मूर्ती आणतात आणि घराच्या तिजोरीत ठेवतात. पण तुटलेल्या किंवा फाटलेल्या मूर्ती नकारात्मक ऊर्जा आणतात आणि पैशाची हानी होऊ शकते.
प्रवेशद्वारासमोर आरसा ठेवणे : काही परंपरांनुसार, मुख्य दरवाजासमोर आरसा ठेवल्यास घरातील ऊर्जा आणि पैसा बाहेर जातो. त्यामुळे मुख्य दरवाजासमोर आरसा ठेवणे टाळा. या सवयींना टाळून आणि योग्य पद्धतींनी घराची उर्जा सकारात्मक ठेवल्यास आर्थिक समृद्धीला चालना मिळू शकते