पारनेर तालुक्यात सर्वत्र निलेश लंके यांना मतांची आघाडी , आगामी निवडणूकांमध्ये फायदा
पारनेर [ श्री सुरेश खोसे पाटील यांजकडून ] – नुकत्याच संपन्न झालेल्या लोकसभेच्या निवडणूक निकाला त पारनेर तालुक्यातील ५ ही जिल्हा परिषद गटांमध्ये नूतन खासदार निलेश लंके यांना मतांची आघाडी मिळाल्याने लोकसभा मतदार संघावर प्राबल्भ असलेल्या मावळते खासदार सुजय विखे यांना पराभूत केले .
तसे पाहता जिल्हयातील सर्वांत मोठे प्रस्थ असलेले विखेंच्या घराण्यातील अलीकडच्या काळातील हा मोठा पराभव झाला असून तो ही एका सामान्य सेवानिवृत्त शिक्षकाच्या मुलाने केल्याने राज्यात चर्चिला गेला आहे . निलेश लंके यांना नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून सर्वच तालुक्या मधून मताधिक्य मिळाल्याने त्यांचा विजय सुकर झाला . पारनेर तालुका हा त्यांचा गृह तालुका व या तालुक्यातील मोठे गाव म्हणून ओळखले जाणारे निघोज या गावावर त्यांची खास मेहरनजर असल्याने त्यांनी आमदारकीच्या साडे चार वर्षाच्या कालखंडात पारनेर तालुक्यात सर्वांत जास्त ६० ते ८० कोटी रुपयांची विकास कामे एकट्या निघोज परिसरात ते ही पारनेर तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष ठकाराम लंके , बाबासाहेब कवाद निघोज नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष वसंतराव कवाद व इतर नेत्यांच्या आग्रहा खातर केल्याने निघोज मधून खासदार निलेश लंके यांना मोठे मताधिक्य मिळाले . त्याचबरोबर त्यांनी जवळा , गुणोरे , कोहोकडी , राळेगण थेरपाळ , पठारवाडी , वडगाव गुंड , वडनेर , शिरापूर , अळकुटी , पाबळ , कळस , गारखिंडी , रांधे , दरोडी , लोणी मावळा या गावांची मतदान आकडे वारी व खा .निलेश लंके यांना मिळालेले मताधिक्य पाहता , या निघोज – अळकुटी जिल्हा परिषदेच्या गटात खा . निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे स्पष्ट बहुमत सिद्ध होते . त्यांनी साडेचार वर्षात विधानसभा सदस्य असताना उपमुख्यमंत्री ना अजित पवार यांच्या माध्यमातून पारनेर – नगर विधान सभा मतदार संघातील विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करून आणल्याने त्यांना त्याचा फायदा या लोकसभा निवडणुकीत मतांच्या रूपाने झाल्याचे मान्य करावे लागेल . त्यांना आमदार असताना विकास कामे करताना थोड्या मर्यादा येत होत्या , पण त्यांना आता जनतेने खासदार म्हणून निवडून दिल्याने ते आता राज्या बरोबरच केंद्राचाही निधी खेचून आणतील . निधी मंजूर करून आणण्यात त्यांचा हातखंडा आहे .
खा . निलेश लंके यांनी निघोज – अळकुटी जिल्हा परिषद गटामधील रस्ते , समाज मंदीर , स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र , हायमॅक्स दिवे , पाण्यासाठी बंधारे , हे आणि इतर प्रश्नांबरोबरच लोकांच्या व्यक्तीगत प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले व त्यांचे हे लोकोपयोगी कार्य निघोज – अळकुटी जिल्हा परिषद गटातील जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिक पणे केले . लंके यांना या गटातून २० हजार २५१ मते मिळाली , तर विखे यांना ९ हजार ९५४ मते मिळाली आहेत . यावरून असे दिसून येते की , या गटावर लंके यांचे वर्चस्व राहणार असल्याचे स्पष्ट होते . लवकरच होवू घातलेल्या जिल्हा परिषद निवडणूकां मध्ये लंके यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य उमेदवाराला विजयापासून कोणीही रोखू शकत नाही . त्यांचा तसा मतदार संघातील प्रत्येक व्यक्तीं पर्यंत संपर्क असल्याने त्यांची वेगळीच क्रेझ आहे . लंके यांच्या विजयात त्यांच्या कार्यकर्त्यां चा सिंहाचा वाटा आहे , त्यांनी प्रामाणिक पणे स्वतः ला झोकून देऊन काम केल्याने विजय सुकर झाला .