सामाजिक

शेतकऱ्यांचे कैवारी सरकार नसून, पिक विमा कंपनीकडून मलिमदा लाटणारे सरकार.

Spread the love

यवतमाळ वार्ता
अरविंद वानखेडे
पंतप्रधान पिक विमा योजना अंतर्गत २०२३,२४ मध्ये यवतमाळ जिल्ह्यात खरीपोरब्बी हंगामात दहा लाखाच्या वर शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदवून घेतली होती. मात्र या पिक विमा कंपनीने ही यादी देण्यात सक्षम नकार दिला आहे. त्यामुळे सरकार शेतकऱ्यांचे कैवारी सरकार नसून पिक विमा कंपनीकडून मुलींना लाटणारे सरकार आहे अशी प्रतिक्रिया पत्रकार परिषदेमध्ये संजय रंगे यांनी दिली.
यावर्षी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी, मोझॅक सारख्या सार्वत्रिक प्रादुर्भाव व गारपीट,अवकाळी पाऊस यांनी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. या नुकसानीची ७२ तास पूर्ण सूचना देणे बंधनकारक असताना नुकसानी नंतर विमा कंपनीने जाणून-बुजून वेबसाईट बंद ठेवली टोल फ्री क्रमांक सुद्धा बंद ठेवला त्यामुळे विमा काढून नुकसानी नंतर ४ लाख शेतकरी पूर्व सूचना विमा कंपन्या देऊ शकले नाही.

७२ तासाच्या आत ६,१५,२८८ शेतकऱ्यांनी पूर्ण सूचना देऊन सुद्धा कंपनीने विनाकारण ३,०८१३७ पूर्व सूचना अपात्र ठरविल्या पूर्ण सूचना प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे ४८ तासात होणे बंधनकारक असून सुद्धा ०६ महिन्यापर्यंत पंचनामे झाले नाही. काही शेतकऱ्यांचे अजून सुद्धा पंचनामे झाली नाही. पंचनामे अप्रशिक्षित व नियमबाह्य प्रतिनिधी कडून करण्यात आले. व शेतकऱ्यांकडून या पंचनामाचे ५०० ते १००० हजार रुपये पठाणी वसुली पिक विमा कंपनीने केली. या प्रकारचे पैसे घेतल्याची लेखी जबाब नोंदवून जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आले परंतु याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. विभागीय आयुक्ताचे दि.१, जानेवारी रोजीच्या आदेशानुसार पूर्ण सूचना प्राप्त सर्व शेतकऱ्यांना जोखमीनुसार नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले परंतु सदर आदेशाला सुद्धा कंपनीने केराची टोपली दाखविली आहे.

त्या अनुषंगाने शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यासमवेत येत्या २६ फेब्रुवारी रोजी सोमवारला १२.०० वाजता जिल्हा कचेरी येथे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्या समवेत आंदोलन करणार आहे. या आंदोलनाला जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवून आपल्या हक्काचे लढाई लढावी.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा नियोजित केला आहे. या दौऱ्याच्या आधी शेतकऱ्यांनी पंतप्रधान पिक विमा योजनेत झालेला हा भोंगळ कारभार पंतप्रधान पिक विमा योजना सहभागी झालेल्या शेतकऱ्यांची व्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदी याना दिल्या जाणार का. असा प्रश्न शिवसेनेने यावेळी उपस्थित केला आहे. या योजनेमध्ये विमा काढलेल्या सर्व शेतकऱ्यांची यादी जाहीर करा व सर्व शेतकऱ्यांना जोखमीच्या ९०% विमा भरपाई देण्यात यावी यासाठी शिवसेनेच्या वतीने जिल्हा प्रशासनाला जाब विचारण्या करिता सर्व शेतकऱ्या समवेत आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे राजेंद्र गायकवाड , संजय रंगे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. यावेळी संतोष ढवळे, सागरताई पुरी, व अनेक शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close