राजकिय

रिपब्लिकन नेत्याच्या ऐक्य. संविधानामुळे मी महाराष्ट्राचा कॅबिनेट मंत्री झालो – आ. संजय राठोड

Spread the love

फुले शाहू आंबेडकर चळवळीतील कार्यकत्यांच्या नागरी सत्कार,महिला मोठ्या संख्येने उपस्थित,
नेर :- नवनाथ दरोई
भारतीय संविधानाने या देशातील तमाम शोषित, पीडित, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, दलित,अल्पसंख्यांक आणि बहुजन वर्गाला समतेचा हक्क देऊन सर्वांच्याच उत्थानाचा मार्ग मोकळा केला. संविधान निर्मिती पूर्व राजा हा राणीच्या पोटातून जन्म घ्यायचा. परंतु संविधानानुसार राजा हा आता मतपेटीतून जन्म घेतो. त्यांचेच ज्वलंत उदाहरण म्हणजे भटक्या विमुक्त जमातीतील सर्वसामान्य बंजारा व्यक्ती संजय राठोड हा महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्री होतो हे संविधानाचीच देण आहे. सामाजिक समता परिषद कडून फुले, शाहू आंबेडकर चळवळीतील 150 जोडीला शाल,प्रमाणपत्र व कपडे देऊन माण्यवराच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लॉंग मार्च प्रणेते राष्ट्रीय अध्यक्ष पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रा. जोगेंद्र कवाडे हे मंचावर उपस्थित होते. उद्घाटन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार,रामदास आठवले यांच्या शुभ हस्ते व पाहूण्याच्या उपस्थित डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले,यांच्या प्रतिमेला पुष्पमाला.अर्पण करून दिप प्रजोलीत करण्यात आले.प्रमुख पाहुणे म्हणून दीक्षाभूमी स्मारक समिती सचिव डॉ. राजेंद्र गवई, यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री, तथा नेर, दारव्हा,दिग्रस मतदारसंघाचे आमदार संजय राठोड, महेंद्र मानकर,चरणदास इंगोले,बाळासाहेब सोनोने,भाऊराव ढवळे, सुधाकर तायडे, मनोज नाल्हे,वैशाली मासाळ, अर्चना ईसाळकर व अन्य माण्यवर मंच्यावर विराजमान होते.सत्कारा नंतर अंजली भारती व खलील शैदा यांचा कव्वाली चा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या एशस्वी करीता शिवसेना शिन्दे गटाचे रितेश चिरडे,प्रशांत मासाळ, इंद्रजीत चव्हाण, राहूल तायडे,उमेश गोळे यांनी अथक परिश्रम घेतले. सुत्रसंचालन बापूराव रंगारी यांनी केले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close