श्री क्षेत्र गणोरी येथे नितीनजी कदम यांच्या कडून शालेय विद्यार्थ्यांना असंख्य सायकली व दप्तरे वाटप कार्यक्रम
श्री संत परमहंस महंमदखान महाराज पुण्यतिथि महोत्सवात नितीनजी यांची सामाजिक सेवा*
*प्रतिनिधि / भातकुली :*
भातकुली तालुक्यातील श्री क्षेत्र गणोरी गावामध्ये श्री संत परमहंस महंमदखान महाराज यांची पुण्यतिथि मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरी होत असते. त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या श्री क्षेत्र गणोरी येथे दीपावलीचे स्वरूप प्राप्त होते. विठ्ठल भक्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या या गावामध्ये बाजूच्या भातकुली ग्रामीण परिसरातून मोठ्या प्रमाणात भक्तगणाच्या रांगा पाहावयास मिळतात.
दरम्यान या महंमदखान महाराज यांच्या पुण्यतिथि महोत्सवानिमित्त समाजसेवी नितीनजी कदम गेल्या आठवड्याभरपासून सदर महोत्सवाकरिता अहोरात्र प्रयत्न करीत असल्याच चित्र याआधीसुधहा माध्यमांद्वारे दाखविण्यात आले. तसेच महोत्सव सोहळा सुरळीत व्हावा याउद्देशाने नितीनजी कदम यांच्या संकल्प बहुद्देशीय संस्थेचे प्रतिनिधि यांनी सुध्धा अथक परिश्रम घेतल्याचे निदर्शनास आले.
या भव्य अश्या श्री संत परमहंस महंमदखान महाराज पुण्यतिथि महोत्सव सोहळ्यात समाजसेवी नितीनजी कदम यांच्यातर्फे श्री क्षेत्र गणोरी व भातकुली ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना मदतीचा उपक्रम राबविण्यात आला. यादरम्यान नितीनजी कदम यांनी असंख्य विद्यार्थ्यांना शाळेच्या अंतराचा व विद्यार्थ्यांची होणारी पायपीट बघता असंख्य गरजू विद्यार्थ्यांना नवतंत्रज्ञानयुक्त सायकली वाटप करून सर्वांची माने जिंकली. या नितीनजी यांच्या ‘एक हात मदतीच्या’ उपक्रमामुळे ग्रामीण भागातील लाभार्थी व त्यांच्या पालकाचे डोळे पाणावले होते.
तसेच येथील शेकडो / दोनशेपेक्षा अधिक गोरगरीब व शालेय साहित्यापासून वंचित विद्यार्थ्यांना शालेय दप्तरे वाटप करण्यात आले. या संपूर्ण सामाजिक सेवकार्यामुळे धार्मिक प्रतिष्ठानच्या शिष्टमंडळाद्वारे नितीनजी कदम यांचा सत्कारदेखील करण्यात आला.यापुढेही आपण शोषित,पीडित,शेतकरी,शेतमजूर,कष्टकरी,निराधार महिला,विद्यार्थी,वृद्ध,अपंग,रुग्ण अश्या समाजातील विविध घटकसाठी त्यांचा नये व हक्कासाठी मोठा लढा उभारू व त्यांच्याकरिता आपल्या संकल्प बहुद्देशीय संस्थेकडून प्रत्येक प्रकारची मदत करू अक्षय आशयाचे मनोगत नितीनजी यांनी व्यक्त केले.
या श्री क्षेत्र गणोरी येथील श्री. संत महंमदखान महाराज यांच्या पुण्यतिथि सोहळ्यानिमित्त नितीनजी कदम यांच्या सामाजिक सेवाकार्यामुळे सर्व भातकुली ग्रामीण परिसरातून त्यांचे एकच कौतुक होत आहे.
यावेळी अभिषेक सवाई, स्वप्निल मालधुरे, सतीश भालेराव, ज्ञानेशर झोंबाळे, संजू चौधरी, साचीन घोरमाडे, सिद्धार्थ बनसोड, प्रफुल्ल महल्ले, सागर पचबुध्छे,मोहन भातकुलकर, बबलू गावनेर, रोशन सनके, परेश मोहोळ, संकल्प बहुद्देशीय संस्थेचे सचिव परवेश कदम, अक्षय धुळस, सौ.निशाताई कदम, श्रीमती करूनाताई कदम, वैष्णवी कदम, स्मृती पोटे ,महम्मद खान महाराज संस्थानचे अध्यक्ष अमर देशमुख व आयोजन समिती यांच्यासोबत मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.