अतिवृष्टीचे अनुदान दिवाळी पूर्वी देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांची तहसील कार्यालयात धडक
तहसील कार्यालयात दिवाळी साजरी करण्याचा शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांचा इशारा
नांदगाव खंडेश्वर/ प्रतिनिधी
तालुक्यात सततच्या पावसाने प्रचंड अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे नुकसानीचे पंचनामे होऊन तीन महिण्याचा कालावधी होत असताना अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही तालुक्यातील शेतकऱ्यांनि ठाकरे गटाच्या शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयात धडक देऊन दिवाळी पूर्वी अनुदानाचे वाटप करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला
तालुक्यात तीन वेळा ढगफुटी झाली व अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापूस तूर इत्यादी पिकांचे प्रचंड नुकसान झाले अनेक शेतकऱ्यांना ढगफुटी मुळे संपुर्ण पिके खरडून गेल्याने दुबार तिबार पेरणी करावी लागली या नुकसानग्रस्त भागाचे सर्वेक्षण करून पंचनामे करण्याचे निर्देश दिले तलाठी कृषी अधिकारी यांनी पंचनामे करून तीन महिण्याचा कालावधी झाला असून अद्याप शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही सोयाबीन काढणीचा हंगाम संपला असून एकरी दोन क्विंटल सोयाबीन उत्पन्न झाल्याने पेरणीचा खर्च सुद्धा निघत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले एकीकडे उत्पन्न नसतांना दुसरीकडे सोयाबीनला बाजारात कवडी मोल भाव आहे असून शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे तात्काळ अतिवृष्टीची मदत दिवाळी पूर्वी वाटप करावी अश्या मागणीसाठी आज शिवसेनेने तहसीलदार यांना घेराव करून निवेदन सादर केले यावेळी प्रकाश मारोटकर उपजिल्हप्रमुख बाळासाहेब राणे माजी तालुका प्रमुख विष्णू तिरमारे उपातालुका प्रमुख दिलीप देवतळे बाजार समितीचे संचालक विजय अजबले शहर प्रमुख निलेश इखार माजी सरपंच मधुकर कोठाळे अमोल दांडगे मनदेव चव्हाण अक्षय राणे गुणवंत चांदूरकर सुरज सोळंके रत्नाकर खेडकर रवी ठाकूर शिवचरण ब्रह्मणवाडे भागवत लाहे विजय पेटले पवन पुसदकर आशिष हटवार भुमेश्वर गोरे ज्ञानेश्वर लांजेवार शुभम रावेकर शुभम सावरकर वासुदेव लोखंडे गजानन पोफळे लिलाधर चौधरी निलकमल मारोटकर अक्षय हिवराळे इत्यादी शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते
*सरकारची फक्त घोषणा कृती मात्र शून्य*
शिंदे फडणवीस पवार सरकार फक्त घोषणांचा पाऊस करत असून प्रत्यक्षात मात्र कृतीत ते दिसत नसून अतिवृष्टीचे अनुदान दिवाळी पूर्वी वाटपाची घोषणा मात्र हवेत राहिली आहे दिवाळी पूर्वी अनुदान वाटप न झाल्यास शासकीय कार्यालयात दिवाळी साजरी करू असा इशारा प्रकाश मारोटकर यांनी दिला