सहा मुलांचा बाप भावी सुनेला घेऊन पळाला

रामपूर / नवप्रहार ब्युरो
विवाहबाह्य संबंध हा आता नित्याचा विषय झाला आहे. टीव्ही सीरियल मध्ये दाखवल्या जात असलेल्या सिरियल प्रमाणे दीर – जाऊ, सासू – जावई , सून – सासरे यांचे प्रत्यक्ष जीवनात अवैध सबंध आहेत. त्यामुळे कुटुंब उध्वस्त होत आहेत. उत्तरप्रदेश च्या रामपूर मधून असाच एक विचित्र प्रकार सूर आला आहे. सहा मुलांचा बाप आपल्या भावी सुनेसोबत पळून गेला आहे. कुटुंबीयांनी विरोध करताचा बायको आणि मुलांना त्याने बेदम मारहाण देखील केली आहे.
एनडीटीव्हीने याबाबत दिलेल्या वृत्तानुसार, रामपूर येथील शकील नावाच्या व्यक्तीने घरच्यांचा विरोध असताना देखील आपल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलाचे लग्न एका मुलीशी ठरवले. लग्नाची बोलणी करण्यासाठी गेला असता शकील होणाऱ्या सुनेच्या प्रेमात पडला. यानंतर शकील तासंतास मोबाईल व्यस्त असायचा विशेषत: व्हिडिओवर बोलायचा. यावरुन घरातल्याना त्यांच्या वागण्याबाबत शंका निर्माण झाली.
शकील आणि शबाना यांचे काही वर्षापूर्वी लग्न झाले असून, त्यांना सहा मुले देखील आहेत. पत्नी शबाना आणि तिचा मोठा मुलगा यांना शकीलचे वागणे संशयास्पद वाटू लागल्याने त्यांनी याचा छडा लावण्याचा निर्णय घेतला. शोध घेतल्यानंतर शकील होणाऱ्या सुनेशी फोनवर सतत बोलत असल्याचे उघड झाले. यानंतर मुलाने लग्नास नकार दिला.
दरम्यान, या काळात शकील आणि ती महिला यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. शकीलच्या घरच्यांना या प्रकाराची माहिती मिळाली त्यावेळी त्यांनी याचा विरोध केला पण त्याने पत्नी आणि मुलांना बेदम मारहाण केली. शकीलने घरातून दोन लाख रुपये रोख रक्कम आणि १७ ग्रॅम सोने सोबत नेले आहे.
शकील त्या महिलेशी लग्न करण्याच्या उद्देशानेच बाहेर पडल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे पत्नी आणि सहा मुलांना कोण सांभाळणार असा स्थानिक प्रश्न उपस्थित करत आहेत.
काही दिवसांपूर्वी अलिगढ येथून देखील एक धक्कादायक घटना उघडकीस आली होती. आपल्याच मुलीच्या होणाऱ्या जावयासोबत महिला पसार झाल्याची घटना समोर आली होता. महिलेने घरातून बाहेर पडताना सोबत साडे तीन लाख आणि सोन असा जवळपास पाच लाखांचा मुद्देमाल सोबत घेतला होता.