मोर्शी येथे गणेश विसर्जना करीता कृत्रिम तलाव सज्ज
वारसा संस्थेचा उपक्रम
मोर्शी /ओंकार काळे
पर्यावरणाचा ऱ्हास न होता गणेश विसर्जन धार्मिक पद्धतीने व्हावे,जलप्रदूषण होऊ नये यासाठी शहरातील पशुसवर्धन करणाऱ्या वारसा संस्थेकडून गणेश मूर्ति विसर्जन करण्या करीता सिम्भोरा धरणा लगतच कृत्रिम तलाव निर्माण करून असून या कृत्रिम तलावातच नागरिकांनी गणेश विसर्जन करावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
मागील पाच वर्षापासून वारसा संस्थे तर्फे सिंभोरा रस्त्यावरील नरिमन पॉईंट येथे गणेश मुर्तीचे विसर्जन करण्या करीता कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात येत आहे.
या कृत्रिम तलावाचे पूजन नुकतेच
राहुल चौधरी,राहुल उगले, नगर परिषदे च्या अभियंता संपदा देशमुख चेतन काळमेघ यांच्या हस्ते भूमी पूजन करण्यात आले.
याप्रसंगी वारसा संस्थे चे अध्यक्ष अभिलाष व्यवहारे,कुणाल भिवगडे,नितीन चिखले, वैभव मलवार, प्रशांत चारे,अमन उंडे,रोशन माळोदे, विवेक घुलक्षे हे होते.
गणेशोत्सवा मधे मोर्शी परिसरात प्लँस्टर ऑफ पॅरिस च्या मुर्त्या तयार करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
पूर्वी शहरातील सर्व गणेशमूर्ती चे विसर्जन अप्पर वर्धा धरण, तसेच नदीमधे केल्या जात होते. त्यात प्लास्टर ऑफ पॅरिस च्या मूर्त्या पाण्यामधे विरघळत नसल्यामुळे काही दिवसातच या मूर्ति धरणाच्या तसेच नदीच्या काठावर येतात त्या मुळे या मूर्तीची विटंबना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ही विटंबना थांबविण्यासाठी तसेच श्री चे पवित्र राखण्यासाठी वारसा संस्थे तर्फे कृत्रिम तलावाचा उपक्रम राबवीला जात आहे तसेच गणेश विसर्जना च्या वेळी जमा झालेले निर्माल्य एकत्रित गोळा करुन योग्य त्या ठिकाणी नियोजन करता यावे या करीता तलावा नाजिकच व्यवस्था केल्या जाते.
मागील वर्षी या तलावा मधे अंदाजे चार ते पाच हजार मुर्तीचे विसर्जन करण्यात आले असल्याचे वारसा संस्थेकडून कळविण्यात आले.
नागरिकांनी आपल्या घरी स्थापन केलेली श्री गणेशाची मूर्ती वारसा संस्थेने निर्माण केलेल्या कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करावे असे आवाहन वारसा संस्थेचे अध्यक्ष अभिलाष व्यवहारे यांनी केले आहे.
वारसा संस्थे चे या कार्यक्रमाचे 5 वे वर्ष असून या मध्ये दरवर्षी 5 हजार च्या वर गणेश मूर्तीचे विसर्जन होत असते, या तलावामुळे पाणी प्रदूषण होऊ नये, गणेशमुर्ती ची विटंबना होऊ नये व निर्माल्य सुद्धा पाण्यामध्ये जात नाही, प्लास्टिक सुद्धा इतरत्र फेकल्या जात नाही, कृत्रिम तलाव केल्यामुळे धरणाच्या कडेला दरवर्षी कोणत्याच प्रकारचा कचरा दिसत नाही व पाणी प्रदूषण होत नाही.
अभिलाष व्यवहारे
अध्यक्ष
वारसा संस्था, मोर्शी