पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे हेमंत कांबळे यांची हत्या पत्नी नीता कांबळे यांचा पोलिसांवर आरोप
यवतमाळ ( वार्ता)
अरविंद वानखेडे
हत्या करणाऱ्या आरोपीबद्दल पोलिसांना माहिती दिल्यानंतरही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे आरोपीचे मनोधैर्य वाढले आणि त्याने माझ्या पतीची हत्या केली असा आरोप आज हेमंत कांबळे यांच्या पत्नी नीता कांबळे यांनी लावला. त्या यवतमाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत आपले मत मांडले.
निता चे पती हेमंत कांबळे हे माजी सैनिक होते व त्यांना यवतमाळ येथील नेताजी नगर परिसरात राहणारा श्याम सुभाष जोगदंड या गुंड प्रवृत्तीच्या इसमाचा त्रास होता. श्याम सुभाष जोगदंड याला पोलिसांनी यवतमाळ जिल्यातुन तडीपार केलेले आहे. तरी सुध्दा तो लोहारा पोलिस स्टेशनच्या अधिकऱ्यांशी असलेल्या चांगल्या
संबंधामुळे घरीच यवतमाळ येथे राहत होता. व यवतमाळ शहरात व आजुबाजुच्या परिसरात गांजा विकण्याचा व्यवसाय करीत होता.
श्याम जोगदंड याला त्याच्या वहिनीचे माझे पती हेमंत कांबळे सोबत प्रेम प्रकरण असल्याचा संशय होता परंतु असे कोणतेही प्रेम प्रकरण नव्हते. श्याम जोगदंड हा त्याची वहिनी सुनिता हिला स्वतःच पळवुन घेवुन गेला, यावरून श्याम जोगदंड यांचे वडील सुभाष जोगदंड व त्याची आई यांनी लोहारा पोलिस स्टेशन येथे तक्रार दिली आहे. त्या तक्रारीमध्ये सुभाष जोगदंड या त्याच्या मुलाकडुन माझ्या पतीच्या जीवास धोका असल्याबाबत स्पष्ट म्हटले असल्याचे नीता कांबळे यांनी सांगितले. नीताचे पती हेमंत यांचा श्याम जोगदंड व त्याच्या सोबतच्या सहका-यांनी दिनांक ०२/०६/२०२४ रोजी ७:५० च्या दरम्यान खुन केला, त्यावेळेस अर्जदाराचे पती हेमंत यांनी त्यांचे मोबाईल क ९७६७६८८६६१ या मोबाईल क्रमांकावरून अर्जदार हिचा फोन क्रमांक ९४०५५९९०८७ या क्रमांकावर फोन करून श्याम जोगदंड व त्याच्या सोबतच्या एकाने पिपल्स शाळेच्या मागे रंभाजी नगर येथे त्याच्या गाडीने माझ्या गाडीला धक्का मारला व मला खाली पाडले व चाकूने मांडीवर व कंबरेवर घाव मारले व मी तेथेच पडलो आहे, तु अॅटो रिक्षा घेवुन ये व मला दवाखान्यात उपचाराकरीता घेवुन चाल असे बोलले. त्यावरून मी माझ्या पतीला दवाखान्यात नेल्याचे नीताने सांगितले. दिनांक २७/०४/२०२४ रोजी श्याम जोगदंड हा एका इसमा सोबत माझ्या घरी आला व माझ्या पतीला जीवाने मारण्याची धमकी दिली त्यावेळेस माझ्या पतीने श्याम जोगदंड हा गुंड प्रवृत्तीचा इसम आहे म्हणुन
तक्रार दिली नाही. व त्यानंतर ०७/०५/२०२४ रोजी अर्जदाराचे पतीला फोन करून जिवे मारण्याची धमकी दिली व पुन्हा जीवे मारण्याची धमकी दिली व व्हॉटसअपवर मॅसेज पाठविले. त्यावरून अर्जदार हिचे पती हेमंत कांबळे यांनी लोहारा पोलिस स्टेशन येथील ठाणेदार श्रीमती मुनेश्वर मॅडम यांना ९७६७६८८६६१ या नंबरवरून मुनेश्वर मॅडम ९७७३९७५६३५ या कमांकावर रात्री १०:३१ मिनीटांनी फोन केला. त्यानंतर त्यांनी लोहारा पोलिस स्टेशन येथे लेखी तक्रार देण्याविषयी सांगितले त्यावरून अर्जदार ही तिच्या पती सोबत लोहारा पोलिस स्टेशन येथे तक्रार देण्यास गेली व त्यावेळी लोहारा पोलिस स्टेशन येथील अधिकारी सावरकर यांनी अर्जदार हिचे पती यांची तक्रार लिहुन घेतली व त्यावर सही घेतली. अर्जदार हिचे पती यांनी त्यावेळेस फिर्यादीची प्रत मागितली असता सदर फिर्याद चौकशी मध्ये ठेवली आहे असे त्यांनी त्यावेळेस सांगितले. अर्जदार यांच्या सोबत त्यावेळेस अर्जदार हिचे पती व त्यांचे मित्र हे लोहारा पोलिस स्टेशन येथे त्यावेळी हजर होते. या बाबीची सि.सी. टिव्ही द्ववारे खात्री केल्या जावू शकते. त्या नंतर सदर बाब श्याम जोगदंड यास माहित झाल्याने तो मुद्दाम अर्जदाराच्या घरासमोर २-३ व्यक्ती घेवुन आला त्यावेळेस अर्जदाराचे पती यांनी दिनांक ०७/०५/२०२४ रोजी रात्री १२:०० वाजता पोलिसांच्या ११२ वर फोन केला. सदर बाब अर्जदाराच्या पतीच्या फोनमध्ये रेकॉर्ड झाली आहे. ११२ वरून लोहारा पोलिस स्टेशन यांना सांगण्यात आले परंतु लोहारा पोलिस स्टेशन यांनी त्यावेळेस कोणतीही कार्यवाही केली नाही.
लोहारा पोलिस स्टेशन यांनी हद्दपार असतांना सुध्दा श्याम जोगदंड याचे वर योग्य ती कायदेशिर कार्यवाही केली असती तर पतीचा जिव वाचला असता असे नीताने सांगितले. श्याम जोगदंड हा हद्दपार असतांना मे महिन्यांमध्ये लोकांचे जोरजबरदस्तीने मोबाईल हिसकावुन घेतले त्यावरून त्याचे वर लोहारा पोलिस स्टेशन येथे भा.दं.वि. चे कलम ३९२ अंतर्गत गुन्हा दाखल झाला. व सदर आरोपीस अटक करून न्यायालयात हजर केले. व न्यायालयाने आरोपीची लोहारा पोलिस स्टेशन यांनी योग्य माहिती न दिल्यामुळे जमानत झाली. त्यानंतर त्यास हद्दपार असलेल्या ठिकाणी सोडुन सुध्दा दिले नाही. त्यामुळे त्याची हिंमत वाढत गेली. त्यामुळे सदर प्रकरणाचा तपास निष्पक्षपणे व सर्व तांत्रिक बाजुने करावे असे अधिकारी यांना आदेशीत करावे. तसेच सदर प्रकरणाचा तपास ताबडतोब उपविभागीय अधिकारी या दर्जाच्या अधिका-यांकडे देण्यात यावा अन्यथा दिनांक १२/०६/२०२४ रोजी जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्या कार्यालयात संपुर्ण कुटुंबासह सासु, मुल, मुली व अर्जदार स्वतः आत्महत्या करेल व या सर्वास लोहारा पोलिस स्टेशन येथील अधिकारी जबाबदार राहिल असे नीता कांबळे यांनी म्हटले आहे.