उमेदवारी कोणालाही मिळो एकजुटीने लढायचे – इंडिया अलायन्स चा निर्धार

सर्वपक्षीय जिल्हास्तरीय बैठकीत सर्व घटक पक्षांचे शेकडो पदाधिकारी, नेते व प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले
कोणत्याही स्थितींत इंडिया अलायंस चा उमेदवार जिंकलाच पाहीजे यासाठी सामुहीक संकल्प’
लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी सामुहीक प्रतिबद्धता जाहिर करण्यात आली
वर्धा / आशिष इझनकर
आगामी लोकसभा 2024 निवडणूक संदर्भाने वर्धा जिल्ह्यातील पुर्वतैयारीचा आढावा घेण्यासाठी महाविकास आघाडी – इंडिया अलायंस मधे सहभागी पक्ष, संघटनांची संयुक्त बैठक स्थानिक महात्मा लॉन, नालवाडी वर्धा येथे घेण्यात आली. या बैठकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, आम आदमी पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, प्रहार संघटना, किसान अधिकार अभियान, युवा संघर्ष मोर्चा, संभाजी ब्रिगेड, विदर्भ विकास परिषद, रिपब्लीकन पार्टी आंबेडकरी ,कामगार संघटना आदी संघटनांचे जवळपास 500 च्या वर पदाधिकारी, प्रमुख नेते व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
बैठकीत इंडिया अलायंस महाविकास आघाडीची जिल्हा स्तरावर औपचारिक संयुक्त समिती ची घोषणा करण्यात आली. यावेळी लोकशाही , स्वातंत्र्य व संविधान वाचवण्यासाठी केंद्रातील मोदी शहा चे सरकार हटवणे गरजेचे आहे. वर्धेतून इंडीया अलायंस च्या एका खासदाराची जागा आम्ही काहीही झाले तरी जिंकू हा सामुहीकरीत्या संकल्प करण्यात आला.
इंडिया अलायंस तर्फे कोणत्याही पक्षाला व व्यक्तीला उमेदवारी मिळाली तरी त्या उमेदवाराला जिंकून आणन्याची जबाबदारी आपली सामुहीक आहे. त्यामुळे किमान निवडणुक निकाल जाहीर होईपर्यंत आम्ही वर्धा लोकसभा मतदार संघातील सहभागी सर्व पक्ष – संघटनांचे सहकारी ही वज्रमूठ सैल होऊ देणार नाही , हे ही या वेळी जाहीर करण्यात आले. सर्वांनी सामुहीकरीत्या अनुशासन राखावे, आवश्यक सामंजस्यच्या नियमांचे पालन करणे यावर चर्चा व नियम करण्यात आले.
लोकसभा क्षेत्रातील सहभागी पक्ष संघटनांचे अध्यक्ष हे अलायंस चे प्रवक्ते असतील. जिल्हास्तरीय समिती व तालूका स्तरावर समिती पुढील दोन दिवसात तयार होतील. बूथ स्तरावरही पुढील आठवडय़ात नियोजन पुर्ण होईल. इंडिया अलायंस चे लोकसभा सोशल मीडिया समिती, कार्यकर्ता प्रशिक्षण समिती, कार्य संयोजन समिती, महिला मतदार समिती ची औपचारिक घोषणा पुढील आठवडय़ात करण्याचे निश्चिंत केले.
येत्या 12 मार्च ला सर्व तालूक्यात प्रमुख जागांवर महात्मा गांधींनी केलेल्या ऐतिहासीक दांडी मार्च निमित्ताने देशातून मोदी शहा सरकार हटाव – देश बचाओ हा कार्यक्रम करण्यात येणार असे ठरले.* पुढील दोन दिवसात जिल्हा समिती चे प्रमुख सदस्य तालूका स्तरावर समिती स्थापन करण्यासाठी दौरा कार्यक्रम करीत आहेत.परिवर्तनाच्या घोषणा यावेळी अनेकदा देण्यात आल्या. राष्ट्रगिताने बैठक समापन करण्यात आले