क्राइम

नवरी लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच पळून गेल्याने नवरदेवाने सासऱ्या समोर ठेवली ही अट 

Spread the love

भोपाळ  / नवप्रहार मीडिया 

                   हळदीच्या दिवशी किंवा लग्नाच्या दिवशी इतकेच काय तर फेरे झाल्यानंतर नवरी मुलगी पळून जाण्याचा अनेक घटना घडल्या आहेत.  काही वेळा तर फक्त नवऱ्या मुलांकडील रक्कम आणि दागिने हस्तगत करण्यासाठी मुली लग्नाचे नाटक करतात. आता यामागे पूर्ण एक टीम असते तो भाग वेगळा. शहरातील शिवपुरी येथे राहणाऱ्या कुटुंबासोबत देखील असच प्रकार घडला आहे. दुसऱ्या दिवशी नववधू प्रातः विधीसाठी जाण्याचे सांगून घराबाहेर पडली . त्यानंतर परतलीच नाही. जाताना ती सर्व दागिने आणि रोख रक्कम देखील घेऊन गेली. यानंतर सासरी गेलेल्या जावयाने सासऱ्या पुढे अशी अट ठेवली की सासरच्यांनी चार दिवसाचा अवधी मागितला.

शिवपुरी येथील अमोल येथे राहणाऱ्या एका कुटुंबानेही नवविवाहित वधूचं त्यांच्या घरी स्वागत करण्यात कोणतीही कसर सोडली नव्हती. या कुटुंबाने वधूला लाखोंचे दागिने भेट म्हणून दिले होते. लग्नानंतर सकाळी वधूही सासरच्या घरात पोहोचली. मात्र तोपर्यंत वधूचा हेतू कोणालाच समजला नाही. संध्याकाळनंतर वधूला काय करायचं आहे, हे कोणालाही माहिती नव्हतं.

सकाळी वधूने सासरच्या घरी पोहोचून दिवसभर धार्मिक विधी केले. सर्वजण नववधूच्या स्वागतात व्यस्त होते. दरम्यान, सायंकाळी नवरीने शौचालयाला जात असल्याचं सांगितलं. घरात बाथरूम आणि टॉयलेट होतं. मात्र, लोकांना वाटलं की नववधूला तिच्या घरी बाहेर जाण्याचीच सवय असेल, त्यामुळे सगळ्यांनी तिला जाऊही दिलं. पण शौचाच्या बहाण्याने नववधू भलतंच कांड करणार आहे, हे त्यांना माहिती नव्हतं.

संध्याकाळी वधू शौचालयाला जात असल्याचं सांगून घराबाहेर पडली. मात्र बराच वेळ होऊनही ती परतली नाही. त्यामुळे घरातील सदस्य काळजीत पडले. त्यांनी बाहेर जाऊन वधूचा शोध घेतला असता कुठेही तिचा पत्ता लागला नाही. त्यानंतर नवरी लग्नात दिलेले सर्व दागिने घेऊन पळून गेल्याची बातमी मिळाली. हे समजताच घरात एकच गोंधळ उडाला. इज्जत जाण्याच्या भीतीने वराने थेट सासरी जाऊन मुलीच्या धाकट्या बहिणीकडे लग्नाची मागणी घातली. मुलीच्या घरच्यांनी नवरदेवाकडे चार दिवसांचा अवधी मागितला आहे. यानंतर पुढे काय करायचं? हे ठरवलं जाईल.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close