आर्वी प्रिमीअर लिग क्रिकेट स्पर्धेचे समारोप
खेळाच्या मैदानावर सामाजीक एकात्मकतेचे दर्शन घडते – माजी गृहमत्री अनिल देशमुख
मनभावन संघाने साधली विजयाची हॅटट्रीक तर, आर पी संघ ठरला उपविजेता
आर्वी,दि.१३:- राजकीय फायद्या करीता देशात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्या जात आहे. मात्र खेळाच मैदान अस आहे कि ज्यावर सर्व जाती धर्माचे खेळाडू एक संघ होवून खेळतात. एकीकडे धार्मीक भेदाभेदचे वातावरण तर दुसरी कडे खेळाच्या मैदानावर सामाजीक एकात्मतेचे दर्शन घडते आणी म्हणुनच खेळाला जास्त महत्व दिल्या गेलं पाहिजे असे प्रतिपादन राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी येथे केले.
येथील विध्नहर्ता क्रिकेट क्लबच्यावतीने शुक्रवार (दि.तिन) पासुन येथील तालुका क्रिडा संकुलाच्या मैदानावर आयोजीत केलेल्या आर्वी प्रिमीअर लिग क्रिकेट स्पर्धेचा समारोप रवीवारी (दि. आठ) झाला. यावेळी झालेल्या बक्षीस वितरण समारंभाच्यावेळी ते क्रिकेट खेळाडूंना मार्गदर्शन करीत होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार अमर काळे हे होते तर, पोलीस उपनिरिक्षक वाल्मीक बांबर्डे, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे समन्वयक दशरथ जाधव, काँगेसचे तालुका प्रमुख राजाभाऊ रत्नपारखी, शहर प्रमुख दिलीप जाधव, माजी शहर प्रमुख प्रा.पंकज वाघमारे, माजी नगरसेवक रामु राठी, सामाजीक कार्यकर्ते अन्सार शेख, गजु शिंगाणे, मनभावन संघाचे कोच सुशिलसिंह ठाकुर, रवी भस्मे, रहीम कुरेशी हे प्रमुख अतिथी होते.
माजी आमदार अमर काळे म्हणाले, पैशापेक्षा खेळाला महत्व दिल्या गेल पाहिजे. या क्रिकेट स्पर्धेकरीता खेळाच्या मैदानवर उतरलेल्या प्रत्येक संघा मध्ये वेगवेगळ्या जातीधर्माचे खेळाडू होते. मात्र त्यांनी जाती धर्मालाचा विचार न करता संघाला विजय मिळवून देण्याकरीता जिवापाड प्रयत्न केले हे सर्वांना शिकण्यासारखं आहे. स्पर्धा समारोप प्रसंगी शिस्तब्ध पध्दतीने राष्ट्रगीत झाले आणी यातुन राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यात आला हे सुध्दा महत्वाच ठरतं. पुढल्यावर्षी या पेक्षा सुध्दा चांगल्या स्पर्धा आयोजीत करु व बक्षीसाची रक्कम दोन लाख रुपया पर्यंत ठेवण्यात येईल अशी घोषणा सुध्दा त्यांनी यावेळी केली.
माजी आमदार अमर काळे यांच्या प्रेरणेने आयोजीत या क्रिकेट स्पर्धेत मनभावन ब्लास्टर संघ, आर. पी. सुपरजाइंट संघ, एसीसी फायटर संघ, आय टी वरीअरर्स संघ, विध्यार्थी क्रिकेट संघ, प्रिटिंग प्रेस स्ट्रायकरर्स संघ व स्पीड क्रिकेट संघ सहभागी झाले होते. यातील मनभाव फायटर क्रिकेट संघाने सतत तिसऱ्यांदा विजयाची परंपरा कायम ठेवत हॅट्रीक साधली त्यांना युवक काँग्रेसच्यावतीने घोषीत एक लाख ६१ हजार रुपयाचे प्रथम पारितोषीक व चषक तर, उपविजेत्या आर पी सुपरजाइंट क्रिकेट संघाला एपीएल कमेटी व आरीफ शेख मित्रपरिवाराच्यावतीने घोषीत १ लाख रुपयाचे दुसरे पारितोष व चषक मान्यवरांचे हस्ते देण्यात आले. याशिवाय स्पर्धेचा उत्कृष्ट खेळाडु पुरस्कार तेजस बेंद्रे यांनी, उत्कृष्ट फलंदाज पुरस्कार गणेश मडावी यांनी, उत्कृष्ट गोलंदाज पुरस्कार शुभम फुटाणे यांनी, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पुरस्कार अतुल वानखडे यांनी, तर अतिंम समाना उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार अमोल घोडे यांनी पटकावीला
कार्यक्रमाच्या यशस्वीत्तेकरीता विध्नहर्ता क्रिकेट क्लबच्या सर्व खेळाडू व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. तर प्रत्येक सामान्याचा आनंद घेण्याकरीता शहरातीलच नव्हेतर ग्रामीण भागातील तरुणापासुन मध्यमवयीन खेळ प्रेमींनी प्रंचड गर्दी केली होती.
यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख माजी आमदार अमर काळे, शिवसेना (उबाठा) समन्वयक दशरथ जाधव, तालुका काँग्रेस अध्यक्ष रत्नपारखी, शहर अध्यक्ष दिलीप जाधव, पंकज वाघमारे आदि मंचावर विराजमान होते.