हटके

एक अधुरी प्रेम कहाणीचा करुण अंत

Spread the love

नांदेड / विशेष प्रतिनिधी

त्या दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते,.दोघेही एकाच जातीचे पण मुलीच्या कुटुंबियांकडून या प्रेमसबंधाला वीरोध होता. त्यांना या प्रेमाबद्दल माहिती मिळताच त्यांनी मुलगा पाहून मुलीचे झटपट लग्न लावून दिले. पण या यानंतर सुद्धा त्यांच्यात फोनवर संभाषण सुरू होते. तो तिला नेहमी आत्महत्येची धमकी द्यायचा. इतक्यात मुलगी गावाकडे आली त्यानंतर दोघांनी शेवट सोबत करण्याचा निर्णय घेतला आणि टोकाचे पाऊल उचलले.

उपलब्ध माहितीनुसार, अंजली आनंदा थोरात आणि आकाश वाठोरे अशी मयत प्रेमी युगुलांची नावे असून अंजली हिचे माहेर अर्धापूर तालुक्यातील पांगरी हे आहे. तिच्या आईचा मृत्यू झाल्यानंतर ती उमरी दर्या येथे तिच्या मामांकडे राहायला आलेली होती याच दरम्यान तिचे गावातील आकाश वाठोरे याच्यासोबत प्रेम संबंध जुळले त्यानंतर प्रकरण घरी समजल्यानंतर मुलीचे वडील आणि आजोबा यांनी तिचे लग्न तिच्या आत्याचा मुलगा आनंदा थोरात याच्यासोबत लावून दिलेले होते.

लग्नानंतर देखील अंजली आणि आकाश हे एकमेकांच्या संपर्कात होते . आकाश हा तिला सातत्याने फोनवर आत्महत्या करण्याची धमकी द्यायचा. 28 मार्च रोजी अंजली ही नांदेडला आलेली असताना आकाशने गाडीवर तिला गावी आणले ही बाब अंजली हिच्या आजोबांना समजली आणि वाद झाला. अंजली हिने 29 मार्च रोजी आकाशची पुन्हा भेट घेतली आणि त्यानंतर त्यांनी विषारी औषध घेतले. दोघांवरही उपचार सुरू असताना तीस मार्च रोजी त्यांचा मृत्यू झालेला आहे. अंजली हिच्या मृत्यूची बातमी समजताच तिचा पती हा तात्काळ हदगाव येथे दाखल झाला.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close