शेती विषयक

शेतकऱ्यांनी बिज प्रक्रिया करूनच पेरणी करावी – डॉ. के.पी.सिंह

Spread the love

 

कृषी विज्ञान केंद्र दुर्गापुर येथे समूह प्रथम पथदर्शी प्रात्यक्षिक प्रकल्पाचे आयोजन.

अमरावती दि. (प्रतिनिधी) : मान्सूनच्या आगमनानंतर आता शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. अमरावती जिल्ह्यात सोयाबीन पिकाचे क्षेत्र फार मोठे असून जवळजवळ अडीच लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा आपल्या जिल्ह्यात होतो. शेतकऱ्यांनी घरचेच सोयाबीन बियाणे वापरण्यावर जास्तीत जास्त भर द्यावा, मात्र हे बियाणे पेरतांना बियाण्याची उगवण क्षमता तपासून बियाणे पेरणी करावी तसेच खोडमाशीच्या व्यवस्थापणाकरिता थायमेथॉक्साम ३० एफएस १० मिलि प्रती किलो बियाणे ची बीज प्रक्रिया पेरणीच्या ८ ते १० दिवस अगोदर करून ठेवावी तद्नंतर पेरणी करतांना बियाण्यावर जैविक खते रायझोबियम, पी. एस. बी. आणि जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा ची ५ मिलि प्रती किलो बियाणे प्रमाणे बीज प्रक्रिया करावी असे प्रतिपादन कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. के. पी. सिंह यांनी केले ते कृषी विज्ञान केंद्र दुर्गापुर येथे कृषी मंत्रालय भारत सरकारच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियाना अंतर्गत समुह प्रथम पथदर्शी कार्यक्रम सोयाबीन व उडीद प्रात्यक्षिक प्रकल्पाच्या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून बोलत होते.
कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूरचे कृषी विस्तार विषय विशेषज्ञ डॉ. प्रतापराव जायले, कृषीविद्या विषय विशेषज्ञ डॉ. हर्षद ठाकूर, कृषी सहाय्यक गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. सिंह म्हणाले की भारत सरकार कृषी मंत्रालयाचा हा समूह पथदर्शी प्रकल्प अमरावती जिल्ह्यातील मोर्शी, नांदगाव खंडेश्वर आणि दर्यापूर या तालुक्याततील तेलवर्गीय व दाळवर्गीय पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेला महत्त्वकांक्षी प्रकल्प असून यासाठी या तीन तालुक्यात एकूण सात गावांची निवड करण्यात आली आहे. शेतकरी आताईपणे हंगाम सुरू झाल्यावर पेरणीची घाई करतात आणि नुकसानीला बळी पडतात. पेरणी करिता किमान १०० मीमी किंवा भरपूर पाऊस झाल्याशिवाय आणि जमिनीत पुरेशी ओल असल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असेही ते म्हणाले.
आपल्या तांत्रिक मार्गदर्शनात डॉ. हर्षद ठाकूर यांनी सदर प्रकल्पविषयी संपूर्ण माहिती दिली तसेच सोयाबीन व उडीद पीक उत्पादन, माती व पाणी परीक्षणाचे महत्त्व, प्रकल्पामध्ये असणार्याच पिकांच्या जाती, पीक उत्पादनात खत व्यवस्थापनाचे महत्त्व याबद्दल सखोल मार्गदर्शन केले तर प्रतापराव जायले यांनी बीज उत्पादनाच्या संदर्भात भेसळयुक्त झाडे काढणे, सूक्ष्म अन्नद्रव्याचे व्यवस्थापन याबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमात शेतकऱ्यांना सोयाबीन बीज व जैविक खते निविष्ठा शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रतापराव जायले यांनी केले तर अक्षय गणेशपुरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमाला डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला दत्तक ग्राम असोना, लेहगाव, टाकळी बुद्रुक, अजनी, सासन, रामागाड, नावेड या गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता डॉ. अर्चना काकडे, प्रफुल्ल महल्ले, महेश आखूड, राहुल घोगरे, आकाश धरमकर, संतोष देशमुख, सुरेश वैद्य, आरती येवतीकर, कैलाश शेखावत, ज्ञानेश्वर जिराफे, मुग्धा पिंजरकर, ऋषिकेश शिंदे, महेंद्र सेंगर, सचिन पिंजरकर, अश्विनी पोतदार, संजय घरडे, प्रणाली देशमुख, स्नेहा सवाई, शुभम रेवस्कर, सिद्धार्थ गडलिंग यांनी विशेष परिश्रम घेतले.
.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close