Uncategorized

त्यांना काय माहित होते की सकाळी घरून निघाल्यावर संध्याकाळी त्यांचा मृतदेहच घरी पोहचेल

Spread the love

त्यांना काय माहित होते की सकाळी घरून निघाल्यावर संध्याकाळी त्यांचा मृतदेहच घरी पोहचेल

मुंबई / नवप्रहार डेस्क

                   मुंबई येथे आलेल्या वादळी पावसामुळे घाटकोपर येथे पेट्रोल पंपावर होरसिंग6 कोसळल्याने 14 लोकांचा मृत्यू झाला आहे. यापैकी अनेक जण सकाळी घरून संध्याकाळी परत येण्याचे सांगून गेले होते. पण संध्याकाळी घरी परतला तो त्यांचा मृतदेहच . या घटनेत मरणाऱ्या लोकांमध्ये नालासोपारा येथे राहणारे सतीश सिंह (52) हे देखील होते.

सतीश सिंह हे नेहमीप्रमाणे गाडीच सीएनजी भरायला पेट्रोल पंपावर गेले असता त्यांच्यावर भलंमोठं होर्डिंग कोसळलं. यातच सतीश सिंह यांचा दुर्दैवी अंत झाला आणि एका हसत्या खेळत्या कुटुंबाने पाहिलेल्या स्वप्नांची एका क्षणात राखरांगोळी झाली.

 

 

सतीश सिंह टॅक्सी चालवायचं काम करायचे. सिंह एका सामान्य कुटुंबातले असून पत्नी आणि तीन मुलं असा त्यांचा परिवार आहे. दिवसभर टॅक्सी चालवायची, राबराब राबायचं.. कष्ट करायचे… कुणासाठी? तर घरासाठी. पण याच घरासाठी राबत असताना काळानं त्यांच्यावर घाला घातला आणि सिंग कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

होर्डिंग जेव्हा कोसळलं तेव्हा सतीश सिंह हे त्यांच्या टॅक्सीत गॅस भरायला पेट्रोल पंपावर आलेले होते. पण अवाढव्य होर्डिंग कोसळल्यानंतर कित्येक जण त्याखाली चिरडले गेले आणि काही कळायच्या आतच होत्याचं नव्हतं झालं.सतीश हेही याच होर्डिंग दुर्घटनेचे शिकार ठरले.

सतिश सिंह यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि तीन मुलं आहेत. घरातला कर्ता पुरुषच घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलाय. त्यामुळे आता जगायचं कसं? कमावणार कोण? आयुष्याचा गाडा हाकायचा कसा? असे अनेक प्रश्न या कुटुंबाला पडले आहेतच. पण या प्रश्नांआधीही… सकाळी घरातून निघालेली व्यक्ती.. जी नेहमीप्रमाणे संध्याकाळी घरी येईल, अशा अपेक्षेत घरातले त्यांची वाट पाहत होते. पण आता ती व्यक्ती कधीच आपल्यासोबत नसणार आहे, यावर विश्वास कसा ठेवायचा, हा प्रश्न त्यांना अस्वस्थ करतोय. या कुटुंबासोबत नियतीने केलेली क्रूर थट्टा काळजाचे तुकडे करणारी आहे.

होर्डिंग खाली गाड्यांचा अक्षरशः चेंदामेंदा झालाय. लोखंडाचे गज ज्या वेगाने पेट्रोल पंपवर आदळले असतील, त्याच वेगाने आपलं घर चालवणाऱ्या माणसाचा मृत्यू झालेल्याची आलेली बातमीही सिंग कुटुंबीयांना हारदवणारीच होती. नालासोपाऱ्याचा या कुटुंबाला आता सरकारी मदत मिळेलही. पण आपला माणूस गमावलेल्यामुळे मनावर झालेली खोलवर जखम कशी भरुन निघेल.. हा प्रश्नच आहे..!

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
2

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close