ब्रेकिंग न्यूज

संतप्त जमावाकडून आरोपीची हत्या 

Spread the love

अहमदनगर मध्ये अक्कु यादव प्रकरणाची पुनरावृत्ती 

अहमदनगर / नवप्रहार मीडिया 

                      अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या व्यक्तीची संतप्त जमावाकडून त्याची हत्या करण्यात आली. मुख्य म्हणजे काही दिवसांपूर्वी हा चार महिलांच्या हत्या प्रकरणात तुरुंगातून बाहेर आला होता. अहमदनगर मध्ये नागपूर च्या अक्कु यादव हत्याकांडाची पुनरावृत्ती घडली आहे. 

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, अकोला तालुक्यातील सुगावमध्ये अल्पवयीन मुलीची छेड काढण्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या जमावानं अण्णा वैद्य याच्या घरावर हल्ला केला. छेडछाडीचा गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असतानाच जमाव आक्रमक झाला. जमावाच्या हल्ल्यामध्ये अण्णा वैद्य गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी तातडीनं संगमनेर रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषीत केले.

चार महिलांच्या हत्येच्या आरोपातून निर्दोष मुक्त झालेल्या व्यक्तीची जमावाकडून हत्या करण्यात आली आहे. अण्णा वैद्य असं जमावाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. अकोला तालुक्यातील सुगाव गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

दरम्यान या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. जमावाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या अण्णा वैद्य याच्यावर 2011 साली चार महिलांची हत्या केल्याचा आरोप होता. या प्रकरणात जिल्हा न्यायालयानं त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र त्यानंतर उच्च न्यायालयानं त्याची निर्दोष मुक्तता केली. या घटनेनं खळबळ उडाली आहे.
नागपूर मध्ये घडले होते अक्कु यादव हत्याकांड – काही वर्षांपूर्वी नागपूर मध्ये न्यायालय परिसरात अक्कु यादव नामक गुंडांची हत्या करण्यात आली होती.परिसरातील नागरिकांना अक्कु चा भरपूर त्रास होता. त्याची परिसरात इतकी दहशत होती की तो कोणाच्याही घरात घुसून आया बहिणींची अब्रू लुटत होता.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close