संतप्त जमावाकडून आरोपीची हत्या

अहमदनगर मध्ये अक्कु यादव प्रकरणाची पुनरावृत्ती
अहमदनगर / नवप्रहार मीडिया
अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या व्यक्तीची संतप्त जमावाकडून त्याची हत्या करण्यात आली. मुख्य म्हणजे काही दिवसांपूर्वी हा चार महिलांच्या हत्या प्रकरणात तुरुंगातून बाहेर आला होता. अहमदनगर मध्ये नागपूर च्या अक्कु यादव हत्याकांडाची पुनरावृत्ती घडली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, अकोला तालुक्यातील सुगावमध्ये अल्पवयीन मुलीची छेड काढण्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या जमावानं अण्णा वैद्य याच्या घरावर हल्ला केला. छेडछाडीचा गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असतानाच जमाव आक्रमक झाला. जमावाच्या हल्ल्यामध्ये अण्णा वैद्य गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी तातडीनं संगमनेर रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषीत केले.
चार महिलांच्या हत्येच्या आरोपातून निर्दोष मुक्त झालेल्या व्यक्तीची जमावाकडून हत्या करण्यात आली आहे. अण्णा वैद्य असं जमावाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. अकोला तालुक्यातील सुगाव गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.