शेती विषयक

दुबार पेरणीच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाचे  मोफत बि बियाणे उपलब्ध क- रोशन फुले

Spread the love

समता सैनिक दलाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
भंडारा / हंसराज 
वर्षातील सर्वात महत्वाचा ऋतू म्हणजे पावसाळा आणि पावसाळा सुरू झाला की शेतकरी, शेतमजुरांचा आनंद द्विगुणित होतो. या ऋतूला सुरूवात होऊन जवळपास एक महिना होत आहे. या ऋतूतील दोन नक्षत्र संपून तिसरा नक्षत्र संपत आला तरी पावसाचा पत्ता नाही. हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज फोल ठरला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. त्यामुळे शासनाचे शेतकऱ्यांना मोफत बि बियाणे पुरविण्याची मागणी तहसीलदार यांचें मार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून रोशन फुले तालुका प्रमुख समता सैनिक दल लाखांदूर यांनी केली आहे.
हवामान खात्यावर विश्वास ठेऊन व मृग नक्षत्रात थोड्या फार प्रमाणात पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी आनंदित झाला व त्याने बि बियाणे घेउन पेरणी करण्यास सुरवात केली. काही ठिकाणी अल्प तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडल्याने पेरलेल्या बियानातून अंकुर फुटले परंतू गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून पावसाचा पत्ता नसल्यामुळे शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट आलं आहे.निसर्गाच्या लहरपणाचा फटका नेहमीच जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला सोसावा लागतो. शेतकऱ्यांनी पैशाची जुळवाजुळव करून धान्य खरेदी केले.भात धान, तुर, सोयाबीन, आणि इतर प्रकारचे पिकांची लगवट केली. आणि धान्याला अंकुर फुळताच पाऊस बेपत्ता झाल्याने व हमनान खात्याचा अंदाज चुकल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. त्यामुळे आधीच कर्जबाजारी असलेला शेतकरी पुन्हा कर्जाच्या डोंगराखाली दबल्या जाण्याची व त्यामुळे आत्महत्येस प्रवृत्त होण्याची भीती निर्माण झाली आहे.शासनाने मोफत बि बियाणे पुरवावे व शेती उपयोगी वस्तूंच्या किमती नियंत्रणात आणाव्या,खताच्या व औषधाच्या वाढलेल्या किमती कमी करून कंपन्यांना नियंत्रित करावे,धान्याच्या आधारभूत किमतीमध्ये वाढ करावी,खाजगी शिक्षणसंस्थांची अवैध वाढीव शिक्षण शुल्क आकरणीवर प्रतिबंध घालण्यात यावा,
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत कुटुंबीयांना पंचेवीस लक्ष अनुदान व कुटुंबातील एका सदस्यास शासकीय नौकरी देण्यात यावी, घरकुल योजनेतील लाभार्थ्यांचा ग्रामीण भागातील अनुदान 2.5 लक्ष करण्यात यावा अशा प्रकारे मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार अखीलभरत मेश्राम यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. जर शासनाचे मागण्या मान्य न केल्यास समता सैनिक दलाच्या वतीने राज्यभर शासणाविरोधत आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
निवेदन देतांनी रोशन फुले तालुका प्रमुख समता सैनिक दल लाखांदूर, प्रशांत वासनिक संघटक, राहुल राऊत, कृष्णा सुर्यवंशी, जयगोपल लांडगे, केशव रामटेके, संदीप खोटेले, मंगेश भांडारकर, आदर्श बेंदवार, सुनिल दांबोडे, रोशन सोनटक्के, नरेश सोनटक्के व ईतर स. सै. व सामजिक कार्यकर्ता उपस्थितीत होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close