क्राइम

घरगुती वाद विकोपाला गेला ; पतीने पत्नीचां  खून केला

Spread the love

लाखनी ( भंडारा)/ नवप्रहार मीडिया

             पती पत्नी म्हटलं की त्यात बारीक सारीक वाद होत राहतात.पण हेच शुल्लक वाद विकोपाला गेले तर मग हत्या , खून यासारखे प्रकार घडतात.नवरा बायकोचा वाद विकोपाला गेक्याने नवऱ्याने बायकोचा खून करून स्वतः कालव्यात उडी घेत आत्महत्या केली आहे. यामुळे मात्र त्यांचे दोन्ही मुलं आई वडिलांच्या प्रेमाला मुकले आहेत.या घटनेने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

 उपलब्ध माहिती नुसार लाखनी तालुक्यातील सिलोटी गावात भारत चाचेरे आणि भारती चाचेरे हे दाम्पत्या आपल्या दोन मुलांसह राहते. भारत चाचेरे मजुरी काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. या दाम्पत्यामध्ये घरगुती कारणातून नेहमी वाद व्हायचे. बुधवारी नेहमीप्रमाणे पती-पत्नीमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेला अन् पतीने लाकडी पाट पत्नीच्या डोक्यात घालून तिची हत्या केली. पत्नीची हत्या केल्यानंतर पती फरार झाला.

दरम्यान, हत्येची घटना उघड होताच लाखनी पोलिसांनी माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच लाखनी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत महिलेचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. यानंतर पोलिसांनी फरार पतीचा शोध सुरु केला. पतीचा शोध घेत असतानाच गावातील कालव्यात त्याचा मृतदेह तरंगताना आढळून आला. यानंतर पतीच्या आत्महत्येची बाब उघडकीस आली.

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close