पत्नीने सर्व उपाय करून पाहिले पण पती उत्तेजित होत नसल्याने पत्नीने गाठले ठाणे

नवीन लग्न झालेले जोडपे स्वतःच्या मस्तीत गुंग असतात. घरची मंडळी देखील त्यांना सुरवातीच्या काही दिवस काहीच बोलत नाही. कारण त्यांना माहीत असते की एकदा का हे प्रपंचात लागले तर मग यांना स्वतःसाठी वेळ मिळणार नाही. नवीन जोडप्याला एकमेकांना समजून घेता यावे यासाठी घरची मंडळी त्यांना हनिमून वर पाठवतात . पण सध्या गुजरात च्या अहमदाबाद मधून जे प्रकरण समोर येत आहे ते वाचून तुम्हीही शॉक व्हाल. लग्नाला काही दिवस झालेली नवरी ने सरळ पोलीस स्टेशन गाठत तक्रार केली की तिचा नवरा अनेक उपाय करून उत्तेजित होत नाही. नव्या नवरीचे म्हणणे ऐकून पोलिसही काही काळासाठी स्तब्ध झाले.
जुनागड जिल्ह्यातील हा प्रकार आहे. यामध्ये एका 23 वर्षीय विवाहितेचे फेब्रुवारी 2022 मध्ये पोरबंदरमध्ये लग्न झाले. लग्न चांगलं थाटामाटात झालं. पण लग्नानंतर केवळ दोन आठवड्यांनंतर वधूला कळले की तिच्या पतीला शारीरिक संबंधांमध्ये अजिबात रस नाही. पत्नीने आरोप केला आहे की, जेव्हाही तिने पतीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिची निराशाच झाली. पतीने तिला कोणताही प्रतिसाद दिला नाही. नवविवाहितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटलं की, ‘पतीने लग्न केले. मात्र, तिच्याशी शारीरिक संबंध ठेवून तिला पत्नी होण्याचा अधिकार दिला नाही’.
सासरच्यांकडे तक्रार केल्यावर मिळाली धमकी –
नवविवाहित महिलेने तक्रारीत लिहिले आहे की, तिने पतीच्या वागणुकीची माहिती सासरच्या मंडळींना दिली असता त्यांनी तिला समजून सांगण्याऐवजी तिला फटकारले. याची चर्चा कुठंही करू नकोस, असेही म्हटलं. जेव्हा तिने तिच्या आई-वडिलांना सांगितल्याचे पतीला हे समजले तेव्हा त्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.