राज्य/देश
कोलकत्याच्या ऋतुराज हॉटेल ला आग: 14 लोकांचा होरपळून मृत्यू

कोलकाता /नवप्रहार ब्युरो
वाढत्या तापमानामुळे आगीच्या घटनेत देखील वाढ झाली आहे. कोलकाता येथील फलपट्टी मच्छुआ भागातील ऋतुराज हॉटेल ला लागलेल्या आगीत 14लोकांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. तर 22 लोकांना वाचविण्यात प्रशासनाला यश आले आहे.
काही लोक अजूनही आत अडकल्याची भीती आहे. बचावकार्य सुरू आहे.
पोलिस आयुक्त मनोज वर्मा म्हणाले की, रात्री सव्वा आठ वाजता ऋतुराज हॉटेलमध्ये आग लागली. माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिस पथके घटनास्थळी पोहोचली आणि बचावकार्य सुरू केले. आतापर्यंत 14 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अपघाताच्या चौकशीसाठी एक विशेष पथक तयार करण्यात आले आहे. हॉटेलच्या चौथ्या मजल्यावर बसवलेल्या वीज मीटरमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, अनेक लोक जीव वाचवण्यासाठी हॉटेलच्या छतावरून आणि खिडक्यांमधून उड्या मारताना दिसले.
केंद्रीय मंत्री आणि बंगाल भाजप अध्यक्ष सुकांत मजुमदार यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले. ते म्हणाले की, मी राज्य प्रशासनाला बाधित लोकांना तात्काळ वाचवण्याची आणि त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याची विनंती करतो. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी अग्निसुरक्षेचे कडक नियम बनवावेत.
श्रीकांत मजुमदार
केंद्रीय मंत्री तथा भाजपा अध्यक्ष
सुरक्षा व्यवस्था नव्हती
पश्चिम बंगाल काँग्रेस अध्यक्ष शुभंकर सरकार म्हणाले, ही एक दुःखद दुर्घटना आहे. सुरक्षा व्यवस्था नव्हती. कोलकाता महानगरपालिका काय करत आहे ते मला समजत नाही.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1