या कारणाने ट्रॅव्हल्स चा अपघात झाल्याचा आरटीओ चा अहवाल
अमरावती / नवप्रहार मीडिया नेटवर्क
समृध्दी महामार्गावर सिंदखेडराजा नजीकच्या पिंपळगाव जवळ झालेल्या ट्रॅव्हल्स च्या भीषण अपघाता मागे ट्रॅव्हल्स चा टायर फुटणे के कारण नसून आरटीओ ने दिलेल्या अहवालात अन्य कारण समोर आले आहे.
दि 30 ( शुक्रवार ) च्या रात्री नागपूर वरून पुण्याकडे निघालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्स च्या खाजगी बसला बुलढाणा जिल्ह्यातील देउलगावराजा नजीक पिपळगाव जवळ झालेल्या भीषण अपघातात ट्रॅव्हल्स ला लागलेल्या आगीत 26 लोकांचा होरपळुन मृत्यू झाला होता. यात ट्रॅव्हल्स चा टायर फुटल्याने बस पलटी झाली आणि डिझेल टॅंक लीक होऊन ट्रॅव्हल्स ला आग लागली असे चालकाचे म्हणणे आहे. पण आरटीओ ने चालकाचा हा दावा खोडून काढला आहे.पण अमरावती आरटीओ नुसार बस उजव्या बाजूला असलेल्या लोखंडी पोलवर जाऊन आढळली. यामुळे ड्रायव्हरचे नियंत्रण सुटले आणि चालकाच्या उजव्या बाजूचे चाक दुभाजकावर आदळले. यामुळे बसचे एक्सेल तुटले आणि बसचा डिझेल टँक फुटला. बसचे एक्सेल तुटल्यामुळे बस सिमेंट रोडवरून घसरत गेली. त्यानंतर आधीच गरम असलेल्या इंजिन ऑइलने पेट घेतला. एका क्षणात संपूर्ण बसणे पेट घेतला. बस डाव्या बाजूने उलटल्याने बसचे इमर्जन्सी दरवाजे उघडता आले नाहीत. n
महत्त्वाची बाब म्हणजे टायर फुटल्यामुळे अपघात झाल्याचे असे प्रत्यक्षदर्शीयांना कुठेही आढळले नाही. कारण कुठेही टायरचे तुकडे पडलेले दिसले नाहीत. तसेच अतिवेगामुळे अपघात झाल्याचे देखील कुठेही आढळले नाही. ही बस रात्री 11.08 मिनिटांनी समृद्धी महामार्गावर आली आणि 1.32 मिनिटांनी हा अपघात झाला. या बसने 152 किलोमीटर अंतर दोन तास 24 मिनिटांमध्ये पार केले होते. तर बसचा वेग हा 70 किलोमीटर प्रति तास होता.
मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं?
या भीषण अपघातानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघात स्थळाची जाऊन पाहणी केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी या अपघाताची माहिती दिली. “आज सकाळपासूनच आम्ही जिल्हाधिकारी आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात होतो. घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर त्याची भीषणता लक्षात येते. रात्री दीडच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. धावती बस खांबाला धडकून डिझेलच्या टाकीचा स्फोट झाला, त्यांनतर बसला आग लागली, असं प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत. रिपोर्टमध्येही तेच नमूद केलं आहे,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.