सामाजिक

विद्यानिकेतन सीबीएसई स्कूलमध्ये मराठी राजभाषा दिवस साजरा

Spread the love

साहित्य,कादंबरी, विविध गोष्टी तर कवितेतून मराठी भाषेचे विविध पैलू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून वाचनाची आवड निर्माण करण्याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे.

– राजेंद्र जोशी

विद्यार्थ्यांनी सादर केले भाषणे, गीत ,नृत्य, व नाटिका प्रस्तुती

धामणगाव रेल्वे, / प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या मातीला लाभलेलं सरस्वतीच्या मंदिरातील दैदीप्यमान रत्‍न म्हणजेच, ‘कुसुमाग्रज’ महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचं योगदान दिले.मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी त्यांनी परिश्रम घेतले. आपल्या मातृभाषेचा गौरव आणि कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. निमित्याने धामणगाव एज्युकेशन सोसायटीच्या विद्यानिकेतन सीबीएसई स्कूलमध्ये मराठी राजभाषा दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजनाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे संचालक राजेंद्र जोशी, प्रमुख वक्ता सागर ठाकरे यांच्या हस्ते कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. वर्ग ४ च्या विद्यार्थ्यांनी ही माय भूमी जन्मभूमी, ही कर्मभूमी आमुची हे महाराष्ट्र गीत सादर केले.वर्ग ६ ची हिमानी अहिरे या विद्यार्थिनीने मराठी भाषा किती महत्त्वाची या विषयावर एकपात्री नाट्य सादर केले. वर्ग ६ च्या विद्यार्थ्यांनी मी मराठी, मी मराठी या गीतावर नृत्य सादर केले. व वर्ग ७ चा नील बहादुर या विद्यार्थ्यांने मराठी भाषेच्या महत्वावर भाषण केले. कुसुमाग्रज हे मराठी साहित्यातील एक प्रमुख व्यक्तिमत्त्व होते आणि त्यांनी महाराष्ट्राची भाषा आणि संस्कृतीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. व महाराष्ट्राला लाभलेल्या संत परंपरेने मराठी भाषेचे थोरवी समाजापर्यंत पोहोचण्याचे कार्य केले. तर संत ज्ञानेश्वर महाराज लिखित ज्ञानेश्वरी ग्रंथात मराठी भाषा अमृता पेक्षाही गोड, रसाळ आहे. व भाषेविषयीचा अभिमान, मराठीची महती व्यक्त केली. अमृतालाही पैजेनी जिंकणारी अक्षरे,अशी अमृतवाणी ज्ञानदेवांच्या प्रत्येक शब्दा शब्दातून व्यक्त झाली. आपणही भाषेचा अभिमान राखला पाहिजे. असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता सागर ठाकरे केले. साहित्य,कादंबरी, विविध गोष्टी तर कवितेतून मराठी भाषेचे विविध पैलू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून वाचनाची आवड निर्माण करण्याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे तसेच महाराष्ट्रात तरी मराठीची अस्मिता जोपासण्याचे कार्यात आपलाही काही वाटा असावा. याचा जाणीवपूर्वक प्रयत्न व्हावा. असे संचालक राजेंद्र जोशी यांनी उपस्थितांना संबोधले. तर चंद्रशेखर आझाद यांच्या पुण्यतिथी निमित्ताने सुरज काळे यांनी भाषण केले. कार्यक्रमाचे संचालन पूजा चौधरी यांनी केले. आभार प्रदर्शन अजिंक्य काडगळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close