मी अजून ते वाचलेच नाही ! बघा कोण म्हणाले असं
मुंबई / नवप्रहार न्यूज नेटवर्क
शरद पवार यांनी ‘ लोक माझे सांगाती ‘ हे आपले आत्मचरित्र प्रसिद्ध केले आहे. त्यात त्यांनी राज्याच्या राजकारणाला घेऊन भाष्य केलं आहे. या पुस्तकात त्यांनी अजितदादा यांच्या सकाळच्या शपथविधी बद्दल देखील आपले मत मांडले आहेत. अजित पवार यांना याबद्दल विचारणा केली असता त्यांनी अजून मी ते वाचलं नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार यांनी पहाटेच्या शपथविधीवर बोलणं टाळलं आहे. अजित पवार यांनी म्हटलं की, लोक माझे सांगाती पुस्तक मी अद्याप वाचलेलं नाही. त्यामुळे मला याबाबत काहीच माहित नाही. मी पुस्तक वाचून याबाबत सविस्तर प्रतिक्रिया देईल, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
सरकार स्थापनेची चर्चा सुरु असताना काँग्रेससोबत चर्चा फार निखळ स्वरुपाची होत नव्हती. काँग्रेस नेत्यांच्या आडमुठेपणाच्या भूमिकेमुळे चर्चेत रोज अडचणी येत होत्या. आम्ही अतिशय सामंजस्य पद्धतीने काँग्रेसला समजून घेत होतो. परंतु त्यांचा प्रतिसाद काहीसा अडेलतट्टू होता, असं पुस्तकात म्हटलं आहे.काँग्रेस नेत्यांची आडमुठेपणाची भूमिका
एकत्रित बैठकांचा सपाटा सुरू असतानाच अशाच एका बैठकीत संगत राहणं अवघड गेलं. यापुढे बोलण्यात अर्थ नाही, अशी भावना झाली. सरकारस्थापनेत एक नाट्यमय वळण येणार आहे याची आम्हा कुणालाच कल्पना नव्हती. अजित भावनाप्रधान आहे आणि तिरीमिरीत त्यानं हे पाऊल उचललं असावं, असा माझा अंदाज होता, असं शरद पवारांना पुस्तकात म्हटलं. (Political News)
बंड मोडुन काढण्याचा आम्ही पहिला निर्णय घेतला. आमच्या पदाधिकाऱ्यांशी आणि सहकाऱ्यांशी बोलून गेलेल्या सर्व आमदारांना परत आणण्यासाठी पावलं उचलायला मी सांगितली. ‘चव्हाण प्रतिष्ठान’ला राष्ट्रवादीचे चोपन्नपैकी पन्नास आमदार उपस्थित असल्यानं तशीही बंडातली हवा निघालीच होती.अजित पवारांचं बंड कसं मोडलं?
तरीही महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत नेमकी माहिती पोहचणं आवश्यक होतं. त्याचाच भाग म्हणून आम्ही पत्रकारपरिषद घेतली. या पत्रकारपरिषदेला उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेतेही उपस्थित राहिल्यानं ‘महाविकास आघाडी’ अभेद्य असल्याचा पक्का संदेश गेला, असंही पुस्तकात सांगण्यात आलं.