कवी विष्णू सोळंके यांची मातोश्री कृष्णाबाई देशमुख विद्यालयात सदिच्छा भेट
मुख्याध्यापक तिरमारे व रविंद्र सोळंके यांच्या कडून विष्णू सोळंके यांचे स्वागत
अमरावती
स्था.प्र.:-श्री.बाबाराव सार्वजनिक शिक्षण संस्था तळवेल द्वारा संचालित मातोश्री कृष्णाबाई देशमुख विद्यालय प्रभू काॅलनी अमरावती येथे शनिवारला सदिच्छा भेट दिली.यामधे विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्याशी हितगुज करुन चर्चा करण्यात आली. चर्चेमध्ये विद्यालयाचे मुख्याध्यापक विनोद तिरमारे यांनी कवी विष्णू सोळंके यांचा पुढील परिचय करुन दिला. त्यामधे अमरावती विद्यापीठाच्या बी.एस.सी.भाग १ अभ्यासक्रमात कवितेचा समावेश,जवळपास चाळीस वर्षे पासून मराठी गझल लेखन, महाराष्टातील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व विदर्भ स्तरावरील अनेक साहित्य संमेलन यामध्ये निमंत्रित कवी म्हणून सहभागी,अमरावती महानगरपालिका आयुक्त गुडेवार साहेब यांनी शिवटेकडी येथे अमरावती शहराचे सांस्कृतिक वैभव असणारी कविता शिलालेखात लावली आहे,महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळ यांचा गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार २००५ मधे आर.आर.पाटील उपमुख्यमंत्री यांचे हस्ते प्राप्त जवळपास ८ पुस्तके प्रकाशित,शांता शेळके यांचे हस्ते गीत लेखन पुरस्कार पुणे येथे प्राप्त,अमरावती जिल्ह्यातील अनेक सामाजिक सांस्कृतिक चळवळीत सक्रिय सहभाग,
महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा सल्लागार समितीवर सदस्य म्हणून चार वर्षे काम केले आहे,समाज कल्याण विभाग अमरावती जिल्हा येथे वृद्ध कलावंत मानधन समितीवर चार वर्षे काम केले आहे, सुरेश भट, मधुकर केचे,शांता शेळके,ग्रेस हे आवडते साहित्यिक नागपूर आकाशवाणी संगीत विभागाने अनेक गीते स्वरबद्ध केली आहे आहे असे नामवंत लेखक,कवी, गीतकार, साहित्यिक व जे रक्ताच्या नात्यापेक्षा कलमिच्या नात्याला अधिक महत्त्व देणारे विष्णू सोळंके यांना परिचर करुन देवून यांचे स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक विनोद तिरमारे व रविंद्र सोळंके यांनी केले.