जिव्हाळ्याची भिंन्त चँरेटेंबल स्ट्रटची घाटंजीत २३२० दिवसांपासून अन्नसेवा सुरु.
घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार
भुकेल्या व निराधार, मनोरुग्ण यांना क्वचितच समाजातील व्यस्थित लोकांना हात देत निराधार,मनोरूग्न,गरजु,भुंकेल्यासाठी ध्येयवेडे पणाचं स्वप्न बघावं आणि ते अमलात आणंवे ही कल्पणाच कठिनचं असते. स्वताहासाठी जगणं हे सर्वचं करतांत परंतु आपल्या परिवारा प्रमाणे समाजातील व्यस्थित ,निराश्रीत ,मनोरूग्न,गरजुना समजुन गेल्या २३२०दिवसाहून अधीक समाजासाठी अन्नदान सेवेच्या माध्यमातुन एक तरुन झटतोय. एकीकडे व्यवसायांचा बोझा तर दुसरीकडें अन्नदान सेवेचें व्रत पुर्ण करण्यासाठी सुरज व त्यांचे सहकारी धडपडत आहे.आधी आयुष्य एकटाचं असलेला सुरज आता एकाचें तीन झाले घरची जवाबदाऱ्या हि वाढल्या तरी, त्यांच ताकतीने तब्बल ४०ते ४५ लोकांना न चुकता आजही दोन घास हक्काचे भरवितोय. त्यांचे अन्नदान सेवा देतांना आनंद वाटतोय ध्येय फक्त एवढंच आहे की, ईश्वरा मी जो वरी जिवंत आहे तोवरी एकही निराधार ,मनोरूग्न,व्यस्थित,निराश्रीत अन्नचा कणही कमी पडु नये व माझ्या हातुन सेवा घडावी हे सूरजचे प्रामाणिक मत व वागणूक आहे. अशिच हि सेवा सुरू असणार व राहणार देंखिल निर्धार सूरजचा व त्यांचे सहकारी यांचा आहे त्याचे या कार्याबद्दल समाजातील दानशूर व्यक्ती ही मदत करत हातभार लावतात.