मॉडेल दिव्या पाहुजा ची हत्या हॉटेल च्या रूम मध्ये गोळ्या झाडून केल्या गेली
मॉडेल दिव्या पाहुजाची हत्या हॉटेल सिटी पॉईंट च्या रुम मध्ये गोळ्या झाडून करण्यात आली होती.आणि मृतदेह हरियाणाच्या तोहाना कालव्यात फेकून देण्यात आला होता. ही कबुली जयच्या कडे मृतदेहाची विखेवात लावण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्या बलराज गिल ने पोलिसांना दिली आहे.
मॉडेल दिव्या पाहुजा हिचा मृतदेह गुरुग्राम पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. दिव्या पाहुजाचा मृतदेह हरियाणातील टोहाना येथे कालव्यात सापडला ही माहिती ANI या वृत्तसंस्थेला गुरुग्रामचे पोलीस अधिकारी सुभाष बोकेन यांनी दिली. मृतदेहाचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफचे 25 सदस्यीय पथक पटियाला येथे पोहोचले होते. गुरुग्राम आणि पंजाब पोलिसांसह एनडीआरएफची टीम पटियाला ते खनौरी सीमेपर्यंतच्या कालव्यात मृतदेहाचा शोध घेत होती. मात्र दिव्या पाहुजाचा मृतदेह हरियाणातील तोहाना कालव्यातून सापडला असून, कालव्यातून मृतदेह बाहेर काढल्यानंतर पोलिसांनी त्याचा फोटो दिव्याच्या कुटुंबीयांना पाठवला, ते पाहून त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली. गुरुग्राम गुन्हे शाखेचे सहा पथक मृतदेहाच्या शोधात व्यस्त होते.
बलराज देश सोडून बँकॉकला पळून जाण्याचा विचार करत होता. त्याला आणि रवी बंगाला कोलकाता विमानतळावरून अटक करण्यात आली. बलराज गिलने दिव्याचा मृतदेह त्याचा बॉस अभिजीतच्या बीएमडब्ल्यू कारमध्ये ठेवून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी नेला होता. या कामात रवी बंगा त्याला साथ देत होता. अभिजीत सिंगने त्याच्या हॉटेलच्या दोन कर्मचाऱ्यांच्या मदतीनं दिव्याचा मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून त्याच्या बीएमडब्ल्यू कारमध्ये ठेवला. मग त्याने गाडीच्या चाव्या बलराजकडे दिल्या आणि त्याला मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास सांगितले. या कामासाठी अभिजीतने त्याला 10 लाख रुपयेही दिले होते.
गुरुग्राम क्राइम ब्रँचने या हत्येप्रकरणी सहा आरोपींची नावे दिली असून त्यात मुख्य आरोपी अभिजीत सिंह, हेमराज, ओम प्रकाश, मेघा, बलराज गिल आणि रवी बंगा यांची नावे आहेत. या सर्वांना अटक करण्यात आली आहे. दिव्या पाहुजा (27) ही बलदेव नगर, गुरुग्राम येथील रहिवासी होती. तिची धाकटी बहीण नैनाने एका वेब साइटला सांगितले होते की, 2 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास दिव्यासोबत तिचे शेवटचे बोलणे झाले होते. दिव्याने अर्ध्या तासात घरी पोहोचणार असल्याचे सांगितले होते, मात्र सायंकाळी सहा वाजेपर्यंत ती घरी परत न आल्याने कुटुंबीयांना काहीतरी गडबड झाल्याचा संशय आला. नैनाच्या तक्रारीवरून गुरुग्रामच्या सेक्टर-14 पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.