आर्वी येथे जड वाहना करिता तातडीने उडानपुल किव्हा बायपास रस्ता याकरीता महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभाचे मा. उपविभागीय अधिकारी यांना निवेदन

आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी तसेच मा. आमदार दादारावजी केचे विधानसभा आर्वी यांना निवेदन देण्यात आले. निवेदना मध्ये मेनरोड आर्वी ते पुलगाव हा शहरातून जात असून वरदळीचा आहे. तसेच संपूर्ण शाळा व ट्युशन याच रस्त्यावर असल्यामुळे विध्यार्थी सकाळ ते सायंकाळ पर्यंत येणे जाणे करतात. त्यामुळे अपघात नेहमी होतात. चार दिवसापूर्वी कु प्रियाशी लायचा या विध्यार्थीनीचा अवजड वाहना मुळे नाहक बळी गेला.त्यामुळे आपले पाल्य परत घरी येई पर्यंत पालकांनाचा जिवात जीव राहत नाही. नुकत्याच झालेल्या अपघातामुळे आर्वीतील नागरिक व पालक यांनी कमालीची धास्ती घेतलेली आहे. यानंतर कोणाचाही अपघातामुळे दुर्दैवी अंत होऊ नये. करिता तातडीने उडान पूल किव्हा बायपास रस्ता व्हावा म्हणून समस्त नागरिक व संघटने तर्फे आज निवेदन देण्यात आले. तसेच मा. आमदार केचे साहेब यांनी मा. नितीनजी गडकरी यांना निवेदन तयार करून या होणाऱ्या अधिवेशन मध्ये प्रश्न उचलून धरून समस्या निकाली काढतो असे आश्वासन दिले. तसेच मा. रामदासजी तडस खासदार वर्धा व मा. सुमितभाऊ वानखेडे वर्धा लोकसभा निवडणूक प्रमुख यांना सुद्धा निवेदन उद्याला देणार आहे. निवेदन देते वेळी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा आर्वी तालुका अध्यक्ष गणेश काळमोरे, सचिव ज्ञानेश्वर आसोले, कार्याध्यक्ष प्रकाशभाऊ गुल्हाने, माजी नगराध्यक्ष प्रा. प्रशांतभाऊ सव्वालाखे, अरुणजी कहारे,रवी गोडबोले,प्रवीण बिजवे,नितिन खुने, महेश जयसिंगपूरे,प्रवीण शेलोकर,किसना हांडे, अकलेश गुप्ता, मनोज गुल्हाने, संजय आसोले, देवेद्र गुल्हाने, गणेश देऊळकर,नितिन जयसिंगपूरे, दीपक गुल्हाने,अनिल आसोले इत्यादीची उपस्थिती होती.