सातेगाव येथील युवा अल्पभुधारक शेतकऱ्याची आत्महत्या
–कर्जबाजारीपनामुळे गळफास घेऊन संपविली जिवन यात्रा-
अंजनगाव सुर्जी
अंजनगांव सुर्जी तालुक्यातील सातेगाव येथील अल्पभुधारक अविवाहीत शेतकरी युवकाने सातेगाव चिंचोली रस्त्यावरील शेतशिवारात निंबाच्या झाडाला गळफास घेऊन जिवनयात्रा संपविली.आत्महत्ये मागील कारण सततची नापिकी व कर्जबाजारीपणा असल्याचे प्राथमिक माहीती वरुन समजते.आज दि.१२ रोजी सातेगाव येथील रघुनाथ नागोसा बारेवार यांचे पुत्र आशिष रघुनाथराव बारेवार (३४)या अल्पभूधारक शेतकरी पुत्राने नापिकी,हलाखीची परिस्थिती,बँकेचे कर्ज या सर्व गोष्टीला कंटाळून व येणाऱ्या वर्षासाठी लागणारे शेती साहित्य या सर्व चिंतेमुळे अशा सर्व बाजूंनी वेढलेल्या चिंतेने शेतकरी पुत्राने गावाजवळील चिंचोली रस्त्या लगत गुणवंतराव देशमुख यांचे शेताजवळ असलेल्या निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.सदर घटना दुपारी बारा वाजताच्या दरम्यान घडली.आई, वडील व दोन भाऊ असे कुटुंब असलेल्या आशिष चे वडील अपंग असुन शेतात घेतलेल्या ट्युबवेल चे कर्ज व पिककर्जाचे बोज्याने दररोज मजुरी व शेतात राबणारा निर्व्यसनी आशिष हतबल झाला होता अशी प्राथमिक माहीती समोर येत असुन,अत्यंत मितभाषी मनमिळाऊ आशिष ने आपली जिवनयात्रा संपविल्याने संपुर्ण सातेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.त्याचे पार्थिव उत्तरीय तपासणीस शवविच्छदनास ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आला असुन पुढील तपास रहीमापुर चिंचोली पोलीस करीतआहे.