अंजनगाव बारी येथील शाळेचा प्रश्न लागणार निकाली..!
नितीन कदम यांनी घटनास्थळी भेट देत आंदोलकांना केलें शांत..
*प्रतिनीधी / अमरावती*
*स्थानिक बडनेरा ग्रामीण भागातील अंजनगाव बारी परिसरात चावडी चौक येथील जिल्हा परीषद मुलींची कन्या शाळा बंद करून नवीन जागेवरती बांधण्याच्या प्रस्तावाविरोधात जनारोष बघायला मिळाला. येथिल ग्रामीण परिसरात मुलींचा सुरक्षिततेचा प्रश्न,दळणवळणाची होणारी गैरसोय, रस्त्यांची दुर्दैवी अवस्था, व वाढत चाललेली गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकाचा सामना मुलींना करावा लागत असल्या कारणाने येथील पालकवर्ग जुन्या जागेवरच शाळा बांधून देण्याच्या मागणीवर ठाम राहिले. परिस्थीती चिघळन्याचा मार्गावर असताना नितीन कदम यांनी तात्काळ पालकवर्गाच्या आंदोलन स्थळी भेट देत शेकडोच्या समूहाला शांत केला. तणावपूर्ण वातावरण असताना नितीन कदम यांनी पालकांना शाळेसंदर्भातील अन्यायकारक प्रस्तावाला आपला विरोध प्रकट करतं सोमवारी झालेल्या पालक सभेमध्ये शाळा व्यवस्थापन समितीला जाब विचारत चांगलीच कानउघाडणी केली. त्यावर व्यवस्थापनाच्या ११ पैकी ८ सदस्यांनी नितीन कदम व पालकाच्या मागणीला आपली सहमती दर्शविली. स्थानिक ग्राम पंचायत प्रशासनाला याविषयी विचारले असता शाळा व्यवस्थापन समितीच्या काहीं सदस्यांनी नवीन शाळा उभारणीच्या ठराव घेऊन तो प्रस्ताव ग्राम पंचायतला सादर केला असता मागणीनुसार स्थानिक प्रशासनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला होता. याविषयी अधिकारी वर्गाकडून उडवाउडवीची उत्तरे बघायला मिळत होती. म्हणुन नितीन कदम यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत चांगलेच खडसावले. शाळेच्या प्रस्तावित जागेसंदर्भात गावामध्ये एकच तणावाचे वातावरण बघायला मिळत होते. संपूर्ण वास्तविकता लक्षात घेऊन नितीन कदम यांनी जमाव शांत करतं लवकरच याबाबतचा पाठपुरावा करून शाळेचा प्रश्र्न निकाली लावणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. यासंबधी अधिकाऱ्यांना निवेदन देणेकरिता संपूर्ण पालकवर्ग व संकल्प बहुद्देशीय संस्थेचे सदस्य व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.*
नितीन कदम – सदर भागात दळण – वळण, वाहतूक, रस्त्यांची दुरवस्था, वाढती गुन्हेगारी वृत्ती बघता या अंजनगाव बारी येथिल विद्यार्थिनींच्या अन्यायकारक प्रस्तावाला माझा पुर्ण विरोध असुन जिल्हा परिषदेची शाळा त्याचं ठिकाणी नावीन्यपूर्ण इमारत तयार करून देण्यासंदर्भातील मागणीवर आम्ही ठाम आहोत. यासंदर्भातील निवेदन आम्ही संबधीत अधिकाऱ्यांना दिले आहे. यावर लवकर कारवाही नाही झाली तर आमच्या आंदोलनाला व्यवस्थापनाला सामोरे जावे लागणार.