ब्रेकिंग न्यूज

नववर्षाचं सेलिब्रेशन जीवावर बेतलं ; सहा मित्रांनी गमावला जीव , दोन गंभीर 

Spread the love

रांची  / नवप्रहार मिडिया 

नवीन वर्षाचं सेलिब्रेशन करण्याची पद्धत अलीकडच्या काळात तरुणाईत मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. जीवन जगताना त्यात नवीन काही गोष्टी केल्या की ताजतवान वाटतं ! पुन्हा नव्या जोमाने काम करण्याची उमेद जागी होते हे खरं असलं तरी तरुणाई सेलिब्रेशन च्या नावावर दारू आणि अमली पदार्थाचे सेवन करत आहे हा प्रकार गंभीर आहे. त्यानंतर नशेत आपण काय करतो आहे याचे भान राहत नसल्याने अनेक तरुणांना आपला जीव गमवावा लागत आहे. फक्त सेलिब्रेशन करणारेच आपला जीव गमावतात असे नाही तर यांच्या मुळे काही लोकांना देखील जीव गमवावा लागतो. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशन साठी निघालेल्या मित्रांच्या वाहनाला अपघात झाल्याने सहा मित्रांचा मृत्यू झाला आहे तर दोन गंभीर जखमी आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, बिष्टुपुरच्या सर्किट हाऊस एरियातील साइ मंदिर सर्कलजवळ अपघात झाला. इंडिगो कारमधून ८ तरुण मरीन ड्राइव्हच्या दिशेने जात होते. यावेळी कार पोलला धडकली. यात गाडीत असलेले ८ तरुण गंभीर जखमी झाले.

स्थानिकांनी सांगितलं की, सर्वजण एकमेकांचे दोस्त आहेत आणि रात्री कॉलनीत लिट्टी पार्टीही आयोजित केली होती. त्यानंतर अचानक पिकनिकचा प्लॅन ठरला आणि ते कारने निघाले होते. कारमध्ये सात जण होते अशीही माहिती समोर येत आहे.

अपघात इतका भीषण होता की कारचा चुराडा झाला आहे. गाडीतील पाच तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर एका तरुणाचा एमजीएम रुग्णालयात उपचारावेळी मृत्यू झाला. मृतांमध्ये छोटू यादव, हेमंत कुमार, सूरज कुमार, मोनू महतो, शुभम कुमार यांचा समावेश आहे. तर एकाची ओळख पटलेली नाही.

हर्ष कुमार झा आणि रवी झा हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना टाटा मुख्य रुग्णालयात दाखल केले आहे. अपघाताची माहिती मिळताच आदित्यपूरमधील बाबाकुटी आश्रम इथं शोककळा पसरली आहे. कारमधील सर्व तरुण बाबाकुटी आश्रम परिसरातील आहेत. सोमवारी सकाळी आठच्या सुमारास हा अपघात झाला.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Check Also
Close
Back to top button
Close
Close