शेती विषयक

वरुण राजा परतणार बळीराजा सुखावणार

Spread the love

मुंबई / नवप्रहार मीडिया नेटवर्क .

            जुलै महिन्यात दमदार बॅटिंग केलेल्या पावसाने अचानक ऑगस्ट महिन्यात दडी मारली आहे. या महिन्याचे दोन आठवडे संपले असतांना देखील पाऊस न पडल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. पावसाने उसंत घेतल्याने शेतकऱ्यांनी पिकाची डवरणी आणि फवारणी उरकवली आहे.  सगळी कामे हाताखाली आल्यावर आता बळीराजाला वाट आहे ती वरुण राजाच्या आगमनाची. तर लवकरच विदर्भासह राज्यातील काही भागात पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

 आता हवामान विभागाने (IMD) मोठी अपडेट दिली आहे. भारतीय हवामान विभाग विभागाचे अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी पाऊस कधी परतणार याबाबत माहिती दिली आहे . के. एस. होसाळीकर यांनी केलेल्या ट्विटरनुसार, महाराष्ट्रात येत्या 18 ऑगस्टपासून पाऊस परतण्याची शक्यता आहे. राज्यात 18 ते 31 ऑगस्ट या दरम्यान पावसाची शक्यता आहे. विशेष म्हणजे विदर्भातील काही भागात पावसाची शक्यता आहे. याशिवाय ऑगस्टच्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोकणात देखील पाऊस परतण्याची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात सरासरी पाऊस अपेक्षित असल्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.

यंदा बिपरजॉय चक्रीवादळाचा मान्सूनवर परिणाम झाल्याचे यला मिळाले. केरळमध्ये 1 जूनला दाखल होणारा पाऊस यंदा 8 जूनला दाखल झाला. त्यानंतर महाराष्ट्राच्या रत्नागिरीत 11 जूनला मान्सूनचे आगमन झाले. पण त्यानंतरही पावसाची हवी तशी प्रगती यला मिळाली नाही. चंद्रपूरमधून विदर्भात मान्सून सक्रीय झाला. मात्र आता 15 ते 18 ऑगस्टच्या दरम्यान विदर्भात मान्सूनचा पाऊस सुरु होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविली आहे.

राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांसाठी मान्सूनचा पाऊस महत्त्वाचा असतो. कारण त्यांच्याकडे जलसिंचनाची साधनं नसल्यानं जर पावसानेही दडी मारली तर त्यांना खरीप हंगामात पिकांना पाणी देणं अवघड होऊन बसतं. राज्यातील काही शेतकरी पिकांसाठी पाणी वाचवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, अल्पभूधारक आणि कोरडवाहू शेतकऱ्यांना पावसानं दडी मारल्यानंतर नुकसान सहन करावं लागतं. त्यामुळे राज्यात मान्सूनने दडी मारल्यास परतीच्या पावसाकडे शेतकऱ्याचे लक्ष लागून राहते. त्यामुळे येत्या काही दिवसात मान्सूनचे पुन्हा आगमन झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागणार नाही.

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close