मंडल यात्रेचे घाटंजीत जयंत स्वागत
मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करून ओबीसींना न्याय देण्याची शासनाला मागणी.
घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार
७ ऑगस्ट मंडल दिनाच्या औचित्याने निघालेली मंडल यात्रा दी.४.८.२३ ला घाटंजीत दाखल झाली त्या निमित्ताने घाटंजी तालुक्यातील पिछडा शोषीत संघटन व ओबीसी जनमोर्चा संघटनेची वतीने यात्रेचे स्वागत करण्यात आले. सदर स्वागत व ओबीसी जागृती अभियान कार्यक्रम जयस्तंभ चौक येथे घेण्यात आला. कार्यक्रम अध्यक्षस्थानी ओबीसी जनमोर्चा ता.अध्यक्ष सतिश मलकापूरे होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उमेश कोरमि यात्रा संयोजक,प्रशांत भेले नागपूरकर होते. कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करतांना अध्यक्षांनी मंडल यात्रे बाबत सविस्तर माहिती दीली.प्रमुख मार्गदर्शक कोरमि यांनी कार्यक्रमातुन ओबीसींच्या न्याय हक्कासाठी ओबीसी जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे.ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ७२ वस्तीगृह, २१,६०० विद्यार्थांन करिता स्वाध्याय योजना लागु करावी.ईतर मागास आर्थिक विकास महामंडळास १०० कोटींचा निधी मिळाला पाहिजे. ईतर मागासवर्ग बहूजन कल्याण विभागाद्वारे सर्व जिल्हात स्वतंत्र कार्यालय,अधिकारी व ओबीसी भवन निर्माण केले पाहिजे यासह ईतरही मागण्या शासनाकडे मागण्यात येत असून सर्वांणी एकसंघ राहण्या बाबत विचार मांडले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन कर्णेवार यांनी सुत्रबध पणे केले.कार्यक्रमाला ता.घाटंजी ओबीसीचे पदाधिकारी मधूकर निस्ताणे, सुनिल देठे,महेश पवार,प्रशांत नित,शंकरराव लाकडे,अनंत चौधरी,सुनिल हूड,जितेंद्र जुनघरे सर,राजेद्रं गोबाडे सर,साखरकर सर, ज्ञानेश्वर गटलेवार,प्रशांत मस्के,उपरीकर सर,पांडूरंग निकोडे,अरविंद चौधरी,चंद्रशेखर नोमुलवार,सुभाष गोडे तथा तालुक्यातील इतरही ओबीसी सुजान नागरिक व समाज बांधव बहूसंखेणी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मोलाचे परिश्रम गोलु फूसे,विलास कठाणे,संतोष कर्णेवार,जेष्ठ नागरिक असूनही ओबीसी तळमळीचे लक्ष्मण दोनांडकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार विलास कठाणे यांनी मानले.