शैक्षणिक

शिक्षणाधिकारी यांच्या पत्राला घाबरण्याची गरज नाही- विजय कोंबे 

Spread the love
आर्वी / प्रतिनिधी
   आर्वी पंचायत समिती अंतर्गत नगरपालिका व जिल्हा परिषद शाळांच्या बहुतेक सर्वच मुख्याध्यापकांना शिक्षणाधिकारी (योजना ) यांच्याकडून पत्र बजावण्यात आलेले आहे.
 याबाबत मा. राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी पत्र दिलेले आहे व जिल्हा संघटनेची सुद्धा कार्यवाही चालू आहे.  नवभारत साक्षरता अभियानावर सर्व संघटनांचा बहिष्कार कायम आहे.
    मा. शिक्षणाधिकारी (योजना) यांच्या पत्रामुळे-नोटीसमुळे विचलित न होता नवभारत साक्षरता अभियानवरील बहिष्कार बाबत सर्वांनी ठाम राहावे ही विनंती.
 तसेच सदर पत्रास- नोटीसला कुणीही वैयक्तिक उत्तर देण्याची गरज नाही.
  पण दिनांक 29/2 ते ०१/०३ पर्यंत काम पूर्ण करण्याची दिलेली तंबी-सक्ती यामुळे अनेक लोक विचलित होऊन फोन करत आहे. पण सदर पत्रामुळे कुणीही भीतीने नवभारत साक्षरताचे काम करू नये ही विनंती.
  याबाबत कुणावरही प्रशासकीय कारवाई झाल्यास संघटना (शिक्षक समिती) आपणा सर्वांच्या पाठीशी ठाम उभी राहील अशी ग्वाही याआधी विविध पोस्टद्वारे मा. राज्याध्यक्ष विजय कोंबे सरांनी दिलेली आहे .
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close